गेली 7-8 वर्षे दिल्लीतील गुलाबी थंडीवर एक वेगळेच सावट पडलेले आहे. त्यातून मार्ग न निघाल्याने राजधानीत या दिवसात श्वास घेणेच कठीण झाले आहे. जे लोक दमेकरी आहेत अथवा ज्यांना श्वासाचे आजार आहेत अशांना हे दिवस म्हणजे नरक यातनांचे होत.
राजधानी असली तरी दिल्लीकडे काहीही आपले स्वतःचे नाही. राजस्थानच्या वाळवंटांमुळे दिल्लीत उन्हाळय़ाच्या दिवसात वातावरणात लाल वाळूच्या कणांचे साम्राज्य पसरलेले दिसायचे. ते दोन-तीन दशकांपूर्वी. आता राजस्थान बरेच सुजलाम सुफलाम झाले असल्याने ही धुळीची वादळे कमी झाली आहेत. या वादळांमुळे अतिशय सूक्ष्म असे वाळूकण वातावरणात पसरायचे आणि त्याने गरमी अजून वाढायची. दिल्लीत वाहनांची संख्या ही मुंबई, कोलकाता, चेन्नईमध्ये असलेल्या एकूण वाहनांपेक्षा जास्त असल्याने वाहनांच्या प्रदूषणानेदेखील दोन दशकांपूर्वी सतावले होते. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे सीएनजीचा मोठय़ा प्रमाणावर वापर तत्कालीन शीला दीक्षित सरकारने केल्याने या समस्येवर प्रभावी उपाय सापडला.
पण गेली 7-8 वर्षे दिल्लीतील गुलाबी थंडीवर एक वेगळेच सावट पडलेले आहे. त्यातून मार्ग न निघाल्याने राजधानीत या दिवसात श्वास घेणेच कठीण झाले आहे. जे लोक दमेकरी आहेत अथवा ज्यांना श्वासाचे आजार आहेत अशांना हे दिवस म्हणजे नरक यातनांचे होत. दिल्लीतील एअर क्वालिटी इंडेक्स हा दोन दिवसांपूर्वी 478 होता म्हणजे हवा इतकी खराब की तुम्हाला ठीक राहायचे असेल तर तुम्ही घरात थांबलेले बरे. तुलनाच करायची झाली तर त्या दिवशी मुंबईतील हा इंडेक्स 138 वर होता. मुंबईतदेखील तो प्रमाणापेक्षा जास्त होता आणि त्याच्या तिप्पट दिल्लीत. यावरून प्रदूषणाची समस्या दिल्लीत किती कठीण झाली आहे हे दिसते.
या काळात पंजाब, हरियाणा आणि पश्चिमी उत्तर प्रदेशात शेतकरी नवीन पिकासाठी जमीन तयार करण्यासाठी पेंढा जाळतो आणि त्यामुळे दिल्लीतील हवा अतिशय खराब होत चालली आहे. जसजसे शेतीचे यांत्रिकीकरण वाढले आहे तसतसे शेतात जास्तच पेंढा उरत आहे आणि त्यामुळे ही समस्या वाढतच आहे. यावर प्रभावी उपाय करण्यापेक्षा उत्तरेतील शेतकऱयांच्या डोक्मयावर खापर फोडण्याचे काम वर्षनुवर्षे सुरु राहिले आहे.जगातील 10 सर्वात जास्त प्रदूषित शहरात भारतातील सात-आठ शहरे येतात व चीनमधील एक दोन. यात राजधानी दिल्लीचादेखील समावेश होतो. पंतप्रधान नरेंद मोदी ज्या वाराणसी शहराचे प्रतिनिधित्व लोकसभेत करतात ते जगातील तीन सर्वात जास्त प्रदूषित शहरांपैकी एक आहे असे 2018 साली जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले होते. उत्तर प्रदेशातील कानपूर, बुलंदशहर अशी बरीच शहरे अत्यंत प्रदूषित शहरात मोडतात. एकीकडे राम राज्याची बात, तर दुसरीकडे ‘हे राम’ म्हणावे लागावे असे हाल अशा विचित्र स्थितीत ‘बिमारू’ उत्तर प्रदेश आहे.
दिल्लीतील भाजपाई हे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दुर्लक्ष केल्याने यमुना अजूनच गढूळ झाली आहे असे आरोप करत आहेत तर भाजपशासित हरियाणा आणि उत्तर प्रदेश या नदीत घाण सोडत आहेत असा प्रत्यारोप केजरीवाल करत आहेत. ‘माँ गंगा ने बुलाया है’ असा पुकारा करत पंतप्रधान वाराणसीहून दोनदा खासदार झाले तरी गंगा स्वच्छ झाली काय असे टोमणे विरोधक मारत आहेत. दावे कितीही होत असले तरी जमिनीवर काम दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे.परदेशात भारताची शान वाढली आहे असे दावे एकीकडे केले जात असताना दुसरीकडे मात्र राजधानीतील विदेशी दूतावासातील बरेच लोक डबल मास्क घालत आहेत. एक मास्क कोविडचा तर दुसरा प्रदूषणाचा मुकाबला करण्यासाठी. एका मास्कमुळेदेखील सुलभ श्वासोच्छ्वासाला त्रास होतो तर दोन मास्कने काय होत असेल ती कल्पना केलेली बरी. तात्पर्य काय कोणीही कसाही प्रचार करत असला तरी या प्रदूषणामुळे भारताची चांगली प्रतिमा जगात जात नाही आहे हे वास्तव आहे.
राजकीय प्रदूषणदेखील जोरात
कंगना रनौत यांनी 1947 साली भारताला मिळालेले स्वातंत्र्य म्हणजे एक भीक होती असे विधान करून राजकीय प्रदूषण एका नव्या स्तराला नेलेले आहे. नेहमीच आपल्या वक्तव्यांनी गदारोळ माजवणाऱया कंगना यांच्या या ताज्या वादाला कसे तोंड द्यावयाचे याबाबत भाजपच्या सामान्य कार्यकर्त्याचा तसेच नेत्याचा गोंधळ उडालेला आहे. एकीकडे सरकारने 2022 मध्ये ‘आझादी का अमृत महोत्सव’ घोषित करायचा तर दुसरीकडे कंगनाने असे तारे तोडायचे.
कंगना यांचे श्रे÷ाrंशी संबंध असल्याने कोणी त्यांच्या वाटय़ाला जायचा प्रयत्न करत नाही. पण वरुण गांधी यांनी भाजप अंतर्गत राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी कंगना विरोधाची भूमिका घेऊन श्रे÷ाrना असहज केले आहे. ज्या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात कंगनाने हे उद्गार काढले त्यालादेखील आपण या विधानांशी सहमत नाही असे म्हणावे लागावे यात सारे काही आले. गेल्या लोकसभा निवडणुकीत 5 की 6 व्या स्थानावर फेकले गेलेले काँग्रेस नेते व माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी आपल्या हिंदुत्वावरील नवीन पुस्तकाने भाजपची चांगलीच मदत केली आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुका तोंडावर आल्या असताना भाजपला हिंदुत्वाच्या मुद्यावर रान उठवत राहणे फार जरुरीचे आहे आणि त्या कामात खुर्शीद यांनी सत्ताधारी पक्षाला चांगलाच मुद्दा मिळवून दिलेला आहे. हे काम चुकून झालेले नसून मुद्दामच झालेले आहे. सलमान हे सर्वोच्च न्यायालयात जे÷ वकील असल्याने ते दूधखुळे अजिबात नाहीत. काँग्रेसमध्ये निर्नायकी निर्माण झाल्याने असे भीतराघात होतच राहणार. पक्षात ‘कोण आपले आणि कोण परके’ हेच भल्याभल्याना कळेनासे झाले आहे. जोतिरादित्य शिंदे, सुश्मिता देव, जितीन प्रसाद अशा राहुल जवळच्या लोकांनी अचानक पक्ष सोडलेला आहे. काँग्रेसलादेखील आता प्राणवायूची गरज
आहे.
सुनील गाताडे