ऑनलाईन टीम / मुंबई :
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे रविवारी मध्यरात्रीपासून ठाण मांडून बसलेल्या आंदोलकांना ताब्यात घेत पोलिसांनी आज सकाळी त्यांची आझाद मैदानावर रवानगी केली आहे.
गेट वे ऑफ इंडियावर पर्यटकांची गर्दी होत असते. त्यातच हे विद्यार्थी ठाण मांडून बसल्याने पर्यटकांना नाहक त्रास होत होता. वाहतूक कोंडी होत होती. गेट वे ऑफ इंडियावर आंदोलनाची कोणतीही पूर्व परवानगी या विद्यार्थ्यांनी घेतली नव्हती. त्यामुळे ही जागा विद्यार्थ्यांनी रिकामी करावी, असे आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात आले. मात्र, विद्यार्थ्यांनी पोलिसांना न जुमानल्याने अखेर पोलिसांनी आंदोलकांना आज सकाळी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची आझाद मैदानावर रवानगी करण्यात आली.