चंद्रकांत देवरुखकर / सातारा
सुप्रसिद्ध गझलकार आणि महाकवी म्हणून ओळख असलेले इलाही जमादार यांच्या निधनाने मराठी काव्य व गझल विश्वात शोकाकूल वातावरण झाले. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर खुद्द गजल नवाज भीमराव पांचाळे यांनी इलाहींची प्रख्यात गजल ‘अंदाज आरशाचा वाटे खरा असावा’ गाऊन त्यांना श्रध्दांजली अर्पण केली तर नांदेडचे गझलकार उदय बर्डे यांनी गेला जसा इलाही सोडून माणसांना, भावूक शेर झाले, शब्दास माळताना’ ’थिजलेत आज अश्रू डोळय़ात आता, गेलास का इलाही हलवून काळजांना’ अशी शब्दफुलांची ओंजळ रिती करत भावनांना वाट दिली आहे.
सुप्रसिद्ध गझलकार आणि महाकवी म्हणून ओळख असलेले इलाही जमादार 75 वर्षांचे होते. सांगली जिह्यातील दुधगाव हे त्यांचे मूळ गाव. इलाही जमादार यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात गझलेला पोसले. आपल्या समृद्ध लेखनीतून त्यांनी एकापेक्षा एक अशा गझल दिल्या. मराठी, हिंदी आणि अनेक उर्दू मासिकांमधून त्यांच्या कविता, गझल प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या जाण्याने गझल पोरकी झाल्याची भावना गझलप्रमींमध्ये आहे. गझलकार इलाही जमादार यांची शब्दांवर चांगली पकड होती. शब्दांची जाण असल्यामुळे त्यांच्या कविता थेट मनाला भिडत. मराठी, हिंदी, उर्दू भाषेची दैनिकं, मासिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत.
इलाहींचे सातारकरांशी नाते
इलाही यांच्या गझल सादरीकरणाच्या अनेक मैफिली सातारच्या कन्या शाळेत रंगल्या आहेत. गझलचा चाहता वर्ग साताऱयात निर्माण करण्यात वाई तालुक्याचे नेते मदनदादा भोसले यांचा मोठा आहे. त्यांनी वाईत घेतलेल्या राज्यस्तरीय अखिल भारतीय मराठी गजल संमेलनात गजल नवाज भीमराव पांचळे, गझलकार इलाही जमादार, राजेश उमाळे यांच्यासह असंख्य गझलकार व गायकांचा मेळा तिथे जमला होता. तेव्हापासून मराठी गझल प्रकाराशी सातारकरांशी नाते जुळले आहे.
कन्या शाळेत इलाही जमादार हे रसिकांना प्रथम गझल ऐकायची कशी याचा कानमंत्र द्यायचे अन् मग ‘जखमा अशा सुगंधी, झाल्यात काळजाला’ पासून सुरु झालेली मैफिली उत्तरोत्तर रंगतदार ठरायची. आणि ‘जीवनाला दान द्यावे लागते, श्वास संपतो तो जगावे लागते’ या गझलने मैफिल प्रत्येक अंतर्मुख करुन संपायची. इलाहींचा मोकळा व रसिक स्वभाव माझ्यासह अनेकांनी अनुभवला. त्यांच्या निधनानंतर फेसबुकवर फक्त गझलेसाठी या पेजवर त्यांना अनेक गझलकारांनी शब्दामैफिलीतून आदरांजली व्यक्त केली आहे. साताऱयातही त्यांच्या चाहत्यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण करताना शब्दांच्या जादुगारास मुकल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
गझल मुशाफिरीतील अनोखा गझलकार
1983 साली गझलकार इलाही मुजावर यांची पहिली भेट पुण्यात झाली. तेव्हापासून गेली 37 वर्षे गझल मुशाफिरीतील एक अनोखा गझलकार म्हणून आम्ही एकत्र होतो. इलाही यांनी गझल रचना कशी प्रतिभावान व आशयघन असावी याचा धडा घालून दिला. गझलच्या प्रसार आणि प्रचारात आम्ही झोकून घेतले होते. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा या गझलपासून सुरु झालेले आमचे मैत्र अतूट राहिले. ही गझल आमच्या दोघांसाठी लँडमार्क ठरली. आम्हा दोघांनाही या गझलने नाव दिले. इलाही यांनी अ. भा. चौथ्या गझल संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवले होते. वैविध्यपूर्ण रचनांचे इलाही बादशहाच होते. अमीर खुसरोनंतर 1200 वर्षांनी मराठी व उर्दू असा गझल रचना प्रकार त्यांनी समोर आणला व सर्वांना तो भावलाही होता. जीवाभावाचा मित्र, शब्दांच्या जादुगराला मुकलो एवढेच मी म्हणेन.
गझलनवाज भीमराव पांचाळे
सुरेश भटांच्यानंतर इलाहींचे नाव
इलाही जमादार यांचा जन्म 1 मार्च 1946 रोजी त्यांचा सांगलीतील दुधगावमध्ये झाला. 1964 पासून त्यांनी कविता लेखनास सुरुवात केली. लिखानात जादू आणि कवितेविषयीच्या जाणीवेमुळे त्यांनी अत्यंत कमी काळात कविता आणि गझलक्षेत्रामध्ये आपले नाव कमावले. पुढे त्यांच्या गझलांना एवढी प्रसिद्धी मिळाली की, सुरेश भट यांच्यानंतर गझलेला समृद्ध करणारी व्यक्ती म्हणून त्यांचे नाव घेतले जाऊ लागले.
इलाही जमादार यांचे साहित्य
मराठी ा एक जखम सुगंधी, शब्दसुरांची भावयात्रा, स्वप्न तारकांचे, भावनांची वादळे (गझला व निवेदन), हिंदी अल्बमाहिंदी पॉप गीते, संगीतिकाहिंदा सप्तस्वर, माया और साया, नीर क्षीर विवेक, मराठास्वप्न मिनीचे, नृत्यनाटय़े ः हिंदानीरक्षीरविवेक, जखमा अशा सुगंधी, भावनांची वादळे, दोहे इलाहीचे, मुक्तक आदी इलाही जमादार यांचे काव्य आणि गझल संग्रहही प्रसिद्ध आहेत.