ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० घटनेतून रद्द केले याचा मला आनंद आहे. असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० रद्द करण्यावरुन विरोधी राजकिय पक्षांना पुन्हा एकदा ठणकावले आहे. शहा यांनी लीडरशिप समिटमध्ये बोलताना हे वक्तव्य केले आहे. यावेळी शहा यांनी गेली ७५ वर्षे कलम ३७० होता, तेव्हा काश्मीरमध्ये शांतता होती काय ? असा प्रतिप्रश्न विरोधी पक्षाला करत कलम ३७० घटनेतून रद्द करण्याचे समर्थन केले आहे.
२०१९ साली मोदी सरकारने घटनेतील ३७० ची तरतूद रद्द केल्यामुळे भारताचा स्वर्ग समजल्या जाणाऱ्या जम्मु – काश्मिरसाठी उद्योग गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे आणि पर्यटकांचा ओघ ही वाढण्यास सुरुवात झाली आहे. असे त्यांनी आवर्जून सांगितले. अनुच्छेद ३७० पुन्हा सक्रिय केल्याशिवाय जम्मु – काश्मिरमध्ये शांतता प्रस्थापित होणार नाही, असे जम्मू- काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी म्हटले होते. त्याच्या संदर्भात शाह यांनी हे वक्तव्य केले.
अनुच्छेद ३७० व अनुच्छेद ३५ अ रद्द कधी रद्द केले जाऊ शकतील, यावर कुणाचा विश्वास नव्हता पण ते आता सत्यात उतरले आहे. असे सांगताना, जम्मू- काश्मीर हळूहळू उर्वरित देशासोबत संघटितपणे उभे राहू पाहत आहे’, असे ही शहा म्हणाले.