ग्रामस्थांचा जांबोटी येथे रास्ता रोको : तहसीलदार-पोलीस निरीक्षकांची गावात बैठक : आंदोलनाला सहा गावांचा पाठिंबा
वार्ताहर/कणकुंबी
माण गावाला पंच्याहत्तर वर्षांत साधा रस्ता देखील होऊ शकत नाही. त्यामुळेच माण ग्रामस्थांना रस्त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले. म्हणजे जांबोटी येथे गुरुवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी संपूर्ण माण ग्रामस्थ सहभागी झाले होते. आंदोलनाला हुळंद, आमगाव, सडा, पारवाड, चोर्ला व जांबोटी भागातील नागरिकांनी पाठिंबा दर्शविला होता.
2019 मध्ये अर्धा कि. मी. अंतराचे खडीकरण केले आहे. मात्र डांबरीकरणासाठी वन खात्याने अडथळा निर्माण केल्याने रस्त्याचे काम थांबले. दरवषी पावसाळय़ात ग्रामस्थांची मुख्य रस्त्याला येईपर्यंत नाकीनऊ येते. पावसाळय़ात या रस्त्यावरुन वाहने जाऊ शकत नाहीत. रस्ता नसल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. समस्या सोडविण्यासाठी माण ग्रामस्थांनी दि. 6 ऑक्टोबर रोजी जांबोटी येथे रास्ता रोको आंदोलन हाती घेतले.
खानापूर तहसीलदार दुपारी आंदोलनस्थळी हजर
सकाळी अकरा वाजता जांबोटी बस स्टँडवरील शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला मालार्पण करून रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी माण ग्रामस्थाबरोबरच सडा, चोर्ला, हुळंद, पारवाड, आमगाव व जांबोटी भागातील नागरिक जमा झाले. त्यानंतर खानापूर पोलीस निरीक्षक सुरेश सिंगी यांनी ग्रामस्थांना आंदोलन मागे घेण्यासाठी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु महिला व जांबोटी भागातील काही नेते मंडळींनी तहसीलदार किंवा वरि÷ अधिकारी आल्याशिवाय आपण येथून हलणार नाही अशी भूमिका घेतल्याने अखेर खानापूर तहसीलदार प्रविण कुमार जैन दुपारी बारा वाजता आंदोलनस्थळी हजर झाले. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर केले.
यावेळी पारवाड ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष भिकाजी गावडे, माजी उपाध्यक्ष संजय पाटील, जांबोटी विभागाचे माजी जि. पं. सदस्य जयराम देसाई, ग्रा. पं. माजी सदस्य कृष्णा गावडे तसेच ग्रामस्थांनी आपल्या समस्या तहसीलदारांसमोर मांडल्या. तहसीलदार प्रवीण कुमार जैन व पोलीस निरीक्षक सुरेश शिंगी यांनी यावर तोडगा काढण्यासाठी गावालाच प्रत्यक्ष भेट देऊन त्याच ठिकाणी वनखात्याच्या अधिकाऱयांसोबत चर्चा करून तोडगा काढूया असे सांगितले. जि. पं. चे सहाय्यक कार्यकारी अभियंता होनकांडे व कनि÷ अभियंता होरनट्टी यांनी वन खात्याच्या विरोधामुळेच रस्त्याचे काम बंद पडले आहे असे सांगितले. त्यामुळे तहसीलदार, सीपीआय, सहाय्यक कार्यकारी अभियंता व कणकुंबी वनखात्याच्या अधिकाऱयासोबत माण ग्रामस्थांसमोर चर्चा करून तोडगा काढण्याचे ठरले.
ग्रामस्थांची बैठक
गावच्या मंदिरामध्ये तहसीलदार प्रविण कुमार जैन, सीपीआय सुरेश सिंगी,सहाय्यक कार्यकारी अभियंता होनकांडे व कणकुंबी वनखात्याचे अधिकारी शंकर मराठे, जि. पं. माजी सदस्य जयराम देसाई, ता. पं. माजी सदस्या धनश्री सरदेसाई, जि. पं. चे माजी सदस्य लक्ष्मण बामणे, ता. पं. माजी सदस्य पांडुरंग नाईक, चिदंबर गावकर, स्थानिक कार्यकर्ते व माण ग्रामस्थांची संयुक्त बैठक झाली.
पत्रकार सुनील चिगुळकर यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले. संजय गावकर यांनी नागरिकांना रस्त्यासंदर्भात किती त्रास होतात याची माहिती दिली. सरकारच्या आदेशाप्रमाणे जंगल भागातील रस्ते करण्यासाठी वन खात्याची परवानगी घेणे आवश्यक आहे. वन खात्याने परवानगी द्यावी व बांधकाम खात्याने या संबंधी लागणारी कागदपत्रे पुरवावीत असे ठरले. गावाला गावठाण जमीन असल्याने नकाशा घेऊन रीतसर परवानगी मिळवता येते असे तहसीलदारांनी सांगितले. तसेच शुक्रवारी साहाय्यक कार्यकारी अभियंता व कणकुंबी वनाधिकाऱयांनी त्वरित तोडगा काढून ग्रामस्थांच्या मागणीला सहकार्य करावे असे ठरविण्यात आले.
तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन
यावेळी ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर केले. निवेदनात असे म्हटले आहे की, या रस्त्यावरून ये-जा करताना जंगली प्राणी दृष्टीस पडतात. वेळप्रसंगी जीवितास धोका निर्माण होतो. शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा दररोज ये-जा करावी लागते, तेव्हा गावची प्रामुख्याने रस्त्याची सोय होणे गरजेचे आहे. जर ठराविक कालावधीत रस्ता नाही झाला तर येत्या निवडणुकीवर मान ग्रामस्थ बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी पोलीस निरीक्षक सुरेश शिंगी यांनी ग्रामस्थांनी सहकार्य केल्याने आभार मानले.