पणजी /प्रतिनिधी
राज्यात गेल्या चोवीस तासात सर्वत्र हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस पडला असून नव्याने हवामान खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार सध्या पडणारा पाऊस हा दिनांक 17 ऑक्टोबरपर्यंत पडणार आहे सध्याचा पाऊस हा शेतीला मारक ठरत असून अनेक ठिकाणची शेती वाया जाण्याची शक्यता आहे.
गेल्या चोवीस तासांत राज्यात सर्वत्र बारीक स्वरूपात तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झालेली आहे. जवळपास सर्वत्र सरांसरी एक सेंटीमीटर ते दीड सेंटिमीटर एवढा पाऊस झालेला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सध्या पडणाऱया पावसाचे प्रमाण आज व उद्या वाढण्याची शक्मयता आहे त्याचबरोबर हा पाऊस आता आणखीन दोन दिवसांनी लांबलाअसून तो आता 16 आणि 17 ऑक्टोबर पर्यंत असाच राहणार आहे. राज्यात सध्याची स्थिती पाहता मोठय़ा प्रमाणात भात शेती पिकून तयार असून ते कापणीसाठी सज्ज आहे मात्र सध्या पडणारा पाऊस त्यामुळे भात शेतीचे नुकसान झाले आहे. पुढील पाच दिवस तो सातत्याने जर कोसळत राहिला तर अनेक शेतांमध्ये कापणी यंत्र देखील नेणें कठीण होऊन जाईल त्यामुळे तयार झालेली भातशेतीची नासाडी या पावसा मुळे होण्याची शक्मयता आहे . सध्या कोसळत असलेल्या पाऊस हा शेतीला अत्यंत मारक ठरणारा आहे