ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज बजेट सादर केले. यावर आपली प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बजेटवर जोरदार टीका केली. राहुल गांधी म्हणाले, यावर्षी निराशाजनक आणि गोंधळात टाकणारं बजेट सादर केलं आहे.
मोदी सरकारचा अर्थसंकल्प हा सरळसोट नसून गुतागुंतीचा आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेची घडी बसवण्याच्या अनुषंगाने हा अर्थसंकल्प सादर होईल असं वाटलं होतं. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही असंही राहुल गांधी म्हणाले.