नवी दिल्ली
देशातील खासगी विमान कंपनी गोएअरने आपल्या विमान सेवेच्या माध्यमातून 10 जूनपासून आतापर्यंत स्वदेश वापसी अभियानाअंतर्गत 300 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय चार्टर उड्डाणाच्या अंतर्गत जवळपास विदेशात अडकून पडलेल्या 50,000 पेक्षा अधिक भारतीयांना मायदेशी आणले असल्याची माहिती नुकतीच गोएअरने दिली आहे.
सदरच्या अभियानात प्रामुख्याने सौदी अरब, कुवैत आणि युएई आदी देशांमधून भारतीयांना परत आणले आहे. कंपनीने स्वदेश वापसी उड्डाणे 10 जूनपासून सुरु केली आहेत.
प्रमुख शहरांचा समावेश
सदरच्या अभियानातून देशात आलेले प्रवासी हे प्रामुख्याने दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळूर, हैदराबाद, गोवा, अहमदाबाद, लखनऊ, कोच्ची, चंदीगढ, कन्नूर, भुवनेश्वर आदी शहरांतील आहेत.