प्रतिनिधी / कोल्हापूर
पेट्रोल 100 रुपये तर दूध 100 रुपये का विकू नये असा सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केला तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची गोकुळ ही मातृ संस्था आहे. त्यामुळे या संस्थेवर शेतकऱ्यांचाच प्रतिनिधी संचालक म्हणून का नको असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
बुधवारी कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोकुळच्या निवडणुकी संदर्भातील चित्र अद्याप स्पष्ट झालेली नाही.
कोण कुणाची आघाडी होणार हे लवकरच पुढील मात्र स्वाभिमानी म्हणून शेतकऱ्यांचा प्रतिनिधी दूध संघावर पाठवण्यासाठी आमचे प्रयत्न असतील ही आमची ठाम भूमिका आहे. चर्चेसाठी अद्याप कोणाचे निमंत्रण आलेली नाही परंतु कुणाचीही निमंत्रण आले तरी शेतकरी प्रतिनिधी ही आमची स्पष्ट भूमिका आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप स्वाभिमान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालंदर पाटील महिला बालकल्याण सभापती डॉक्टर पद्मा राणी पाटील रमेश भास्कर सागर शंभू शेट्टी प्रमुख उपस्थित होते.