-प्रचार यंत्रणेत सदस्य आघाडीवर,
कृष्णात चौगले/कोल्हापूर
गोकुळ दुध संघाच्या निवडणूक प्रक्रियेत सत्ताधारी आणि विरोधी आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने सहभागी झाले आहेत. प्रत्येक ठरावधारकांपर्यंत पोहोचून त्यांना मतदानासाठी विनवनी केली जात आहे. `गोकुळ’च्या या लढाईत आता जिल्हा परिषद सदस्यांनीही उडी घेतली असून प्रत्यक्ष प्रचारयंत्रणेत सहभागी झाले आहेत.
शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील यांचे दोन सदस्य वगळता जि.प.तील महाविकास आघाडी व जनसुराज्य शक्ती पक्षाच्या सर्व सदस्यांनी राजर्षी शाहू आघाडीला बळ दिले आहे. तर भाजप व सत्यजित पाटील गटाचे सदस्य सत्तारुढ आघाडीच्या प्रचारात आहेत. जि.प. मतदारगटातील त्यांच्या जनसंपर्काचा दोन्ही आघाडÎांकडून प्रचारासाठी वापर केला जात आहे.
जिल्हा परिषदेत 67 सदस्य आहेत. यामध्ये काँग्रेसचे 13, राष्ट्रवादीचे 11, शिवसेनेचे 10, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 2, शाहू विकास आघाडीचे 2, चंदगड विकास आघाडीचे 2 आणि अपक्ष 1 असे 41 सदस्य महाविकास आघाडीत सहभागी आहेत. तर भाजप 14, जनसुराज्य 6, आवाडे गट 2 असे भाजप आघाडीचे संख्याबळ आहे. गोकुळच्या राजकारणातून शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील यांनी पी.एन., महाडिक यांच्या नेतृत्वाखालील सत्तारुढ आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी जि.प.च्या महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या त्यांच्या गटाचे दोन सदस्य सत्ताधाऱयांच्या प्रचारात आहेत. तर `जनसुराज्य’ पक्षाचे सर्वेसर्वा विनय कोरे यांनी आपली `शक्ती’ पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांच्या राजर्षी शाहू आघाडीला दिली आहे. जिल्हा परिषदेच्या आगामी राजकारणातही महाविकास आघाडीसोबत राहण्याचे त्यांनी अभिवचन दिले आहे. त्यामुळे गोकुळच्या लढाईत जनसुराज्यच्या सहा सदस्यांनी शाहू आघाडीचा प्रचार सुरु केला आहे.
अनेक जि.प.सदस्यांना गोकुळचे संचालक होण्याचे वेध लागल्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केले आहेत. यामध्ये जि.प.चे उपाध्यक्ष सतीश पाटील, माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, जयवंतराव शिंपी, सदस्या कल्पना चौगले यांचे पती केरबा चौगले, गोकुळचे विद्यमान संचालक तथा सदस्य अंबरीष घाटगे, सदस्या सविता भाटळे यांचे पती राजाराम भाटळे, सदस्या रेखा हत्तरगी यांच्या स्नुषा श्वेता हत्तरकी, सदस्या स्वरुपाराणी जाधव यांचे पती सत्यजित जाधव, जीवन पाटील आदी सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये जि.प.तील महाविकास आघाडीतील सदस्यांना शाहू आघाडीतून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा आहे. तर भाजपप्रणित सदस्य सत्ताधारी गटाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. पण 21 जागांसाठी 482 उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे गोकुळसाठी इच्छुक असलेल्या किती जि.प.सदस्यांना उमेदवारी द्यायची याबाबत संबंधित नेतेच निर्णय घेणार आहेत.
छाननीनंतर नेते देणार कानमंत्र
गोकुळ निवडणुकीसाठी मोठÎा प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाले असून 5 एप्रिलला त्यांची छाननी होणार आहे. त्यानंतर 20 एप्रिलपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. माघारीची मुदत संपल्यानंतर दोन्ही आघाडÎांतील उमेदवार निश्चित केले जाणार आहेत. पण एवढÎा उशिरा उमेदवारांवर शिक्कामोर्तब करून प्रचार करणे गैरसोयीचे ठरणार आहे. त्यामुळे ज्यांना उमेदवारी दिली जाणार आहे, त्यांना माघारीची मुदत संपण्यापूर्वीच कामाला लागण्याचा नेत्यांकडून संदेश दिला जाणार आहे. त्यामुळे छाननीनंतर त्वरित दोन्ही आघाडÎातील उमेदवारांची प्रचारयंत्रणा गतीमान होणार आहे.
लिटरला दोन ते चार रुपये जादा अन् वासाचे दूध होणार बंद
गोकुळ दुध संघावर राजर्षी शाहू विकास आघाडीची सत्ता आल्यानंतर प्रतिलिटर दोन ते चार रुपये जादा आणि `वासाचे दुध’ ही संज्ञा बंद करणार असल्याचे विरोधी राजर्षी शाहू आघाडीच्या वचननाम्यामध्ये नमूद केले आहे. तर `आमचं बर चाललंय’ या टॅगलाईनखाली सत्ताधारी मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.
मतदानापर्यंत होणार मोठी राजकीय उलथापालथ
गोकुळ निवडणुकीसाठी दोन्ही आघाडÎांकडे कोणकोणते नेते आणि उमेदवार असतील याबाबतचे बरेचसे चित्र स्पष्ट झाले असले तरी प्रत्यक्ष मतदानापर्यंत मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे. विरोधी आघाडीतील काही नेते आमच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य करून सत्ताधारी आघाडीतील ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी गौप्यस्फोट केला आहे. तर सत्ताधारी गटातील अनेक नेत्यांना आपल्या गोटात घेण्यासाठी शाहू आघाडीच्या नेत्यांनी ताकद पणाला लावली आहे. त्यानुसार आगामी जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुकीचे राजकारण आणि `गोकुळ’च्या अंतर्गत घडामोडींचा संदर्भ पाहता आगामी काळात जिह्यात अनेक राजकीय फेरबदल होण्याची शक्यता आहे.