प्रतिनिधी / कोल्हापूर
गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास केवळ दोन दिवस उरल्याने आज मंगळवारी गर्दी होण्याची शक्यता आहे. विद्यामान संचालकांसह मान्यवर अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. संभाव्य गर्दी आणि कारोनाचा वाढता प्रादुर्भाव यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी 7 जणांचे बारा अर्ज दाखल झाले होते. विद्यामान संचालक अरुणकुमार डोंगळे, विश्वास नारायण पाटील यांनी पहिल्याच दिवशी अर्ज दाखल केले आहेत. तर दुसऱ्या दिवशी सातजणांनी 11 उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये रामराजे कुपेकर, बाबा देसाई या तीन विद्यमान संचालकांचा समावेश होता. अरुण इंगवले, वीरेंद्र मंडलिक, युवराज पाटील यांनी आज अर्ज दाखल केला.
गेली चार दिवस उमेदवारी अर्जही मोठ्या प्रमाणात नेले आहेत. 485 अर्जांची विक्री झाली आहे. 143 जणांनी हे अर्ज नेले आहेत. शनिवारपासून तीन दिवस निवडणूक कार्यालय बंद होते. शनिवार, रविवार शासकीय सुट्टी आहे. तर सोमवारी धुलीवंदनाची सुट्टी असल्याने निवडणूक कार्यालय बंद राहिले. त्यामुळे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे. खासदार पुत्र वीरेंद्र मंडलिक, जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते अरुण इंगवले, गोपाळराव पाटील, दिलीप पाटील, बाबासाहेब देवकर, वसंत नंदनवाडे, युवराज पाटील, सागर धुंदरे, मंजुषादेवी पाटील, सुहासिनी पाटील, सुरेश कुराडे, माजी शिक्षण सभापती अभिजीत तायशेटे यांचे आज अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.