-करवीर तालुक्यात ठोकला तळ
विठ्ठल बिरंजे/कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणूक प्रचारात सत्ताधारी, विरोधी दोन्ही आघाडीकडून वेगवेगळी यंत्रणा वापरली जात आहे. प्रचार यंत्रणेत कर्मचारी संक्रीय झाल्यानंतर आता पुढील टप्प्यात गोकुळमधील प्रसिद्ध असलेल्या कर्मचाऱयांची `रेबॅन गँग’ प्रचारात उतरली आहे. दोन्ही आघाडÎांच्या प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर शुक्रवारी या `गँग’ ने सुत्रे हातात घेतली आहेत. ठरावधारकांना टोकन पुरवण्यापासून त्यांचे मतदान होईपर्यंतची जबाबदारी या गँगच्या सदस्यांवर सोपवण्यात आल्याचे समजते.
प्रचारनंतरचे पुढील सोपस्कराची जबाबदारी
सत्तांतर आणि सत्ता राखण्यासाठी या दोन्ही आघाडÎांवर गोकुळ निवडणुकीची प्रचार यंत्रणा राबवली जात आहे. गेली दोन दिवसांपासून धीम्या गतीने सुरु असलेल्या प्रचाराने आता गती घेतली आहे. एका बाजुला प्रचार यंत्रणा आघाडी घेत असताना ठरावधारक पॉझीटीव्ह येण्याची मालिका सुरु झाल्याने भीतीचे वातवरणही आहे. त्यामुळे ठरावधारकांपर्यंत पोहचण्यासाठी सोशल मिडियाचा प्रभावीपणे वापर सुरु झाला आहे. हे प्रभावी माध्यम असले तरी टोकन आणि पुढील सोपस्कर पुर्ण करण्यासाठी ठराधारकांजवळ किंवा त्यांच्या विश्वासातील व्यक्तीपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. यासाठी कर्मचाऱयांमधील `रेबॅन गँग’ अशी वेगळी ओळख असलेली यंत्रणा कार्यकरत केली आहे. या गँगमधील सर्व सदस्य किंमती रेबॅन वापरत असल्याने त्यांची रेबॅन गँग अशी ओळख तयार झाली आहे. गेली कित्येक वर्षापासून त्यांनी ओळख जपली आहे.
गोकुळची सेवा बजावत अन्य व्यवसाय, उद्योगातही बस्तान
काही कर्मचाऱयानी फक्त प्रचारासाठी सक्रीय केले आहेत. तर आर्थिक व्यवहरा हाताळण्याची जबाबदारी रेबॅन गँगवर सोपवण्यात आली आहे. या गँगमध्ये 18 ते 20 सदस्य आहेत. हे सर्वजन प्रमुख संचालकांच्या गोटातील असून दुग्ध संकलन अधिकारी, सुपरवायझर आदी पदावर त्यांच्या नियुक्त्या आहेत. अधिकाऱयांवराही त्यांचा चांगला वट असल्याने अपवादानेचे संघाच्या कामात दिसता. अशी अन्य कर्मचाऱयांमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे. यातील काहीजन महापालिका निवडणुकीचीही सक्रीय असतात. गोकुळची सेवा बजावत असताना गँगच्या सदस्यांनी अन्य व्यवसाय, उद्योगातही बऱयापैकी बस्तान बसवला आहे.
गोकुळचे सत्ताकेंद्र करवीर `रेबॅन गँग’चे लक्ष्य
गोकुळच्या निवडणुकीत अन्य तालुक्यांपेक्षा करवीर तालुक्यातील ठरावधारक महत्वाचे आहेत. पालकमंत्री सतेज पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांना दक्षिण मतदार संघ महत्वाचा आहे तर आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके यांना करवीर मतदार संघातील सत्ता महत्वाची आहे. दोन्ही आघाडीच्या नेत्यांनी करवीर तालुक्यावरच अधिक लक्ष केंद्रीत केल्याने सत्ताधारी व विरोधकांकडून प्रत्येकी पाच उमेदवार देण्यात आले आहेत. अन्य तालुक्यांच्या तुलनेत येथील ठरावधारक सत्तेची दिशा बदलवू शकतात. आजर्यंतच्या निवडणुकीत हे स्पष्ट झालेले आहे. गोकुळची निवडणूक म्हणजे दक्षिण आणि करवीर विधानसभेची तयारीच असे चित्र या तालुक्यात असल्याने प्रत्येक ठरावधारक महत्वाचा आहे. येथील यंत्रणा हलवण्याची जबाबदारी रेबॅन गँग वर असून गँगमधील बहुतांशी सदस्य शहर परिसरातील आहेत.