प्रतिनिधी / गोडोली
वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर,जागा मर्यादीत,विक्रेत्यांची वाढती संख्या,पार्किंगची समस्या आणि न्यायालयाने नगरपालिकेला चौपाटी हटविण्यासाठी दिलेले आदेशामुळे राजवाडा चौपाटी बंद झाली आहे.त्यांचे पुर्नवसन करण्यात नगरपालिकेला अद्याप ही यश आले नसल्याने गल्लीबोळात हातगाडे लावून त्या विक्रेत्यांवर व्यवसाय करण्याची वेळ आली आहे.हद्दवाढीमुळे नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात आलेल्या गोडोलीतील मोकळया जागेवर नव्याने चौपाटी होऊ शकते. आळूच्या खड्डयापेक्षा विक्रेत्यांना मुबलक जागा,पार्किंगसाठी मोठी जागा,अधिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होऊ शकणार असल्याने नव्या गोडाली चौपाटीसाठी नगरपालिकेने सोईसुविद्या देऊन ती विकसित करावी,अशी मागणी गोडोलीकरांनी तरूण भारत शी बोलताना केली.
सातारकरांची हक्काची चौपाटी बंद झाल्याने हिरमुड झाला आहे.तर चौपाटीवर 100 हून अधिक छोटे व्यवसाय बंद झाल्याने त्याठिकाणी उदरनिर्वाह करणाऱयांची उपासमार होऊ लागली आहे. नगरपालिकेला त्यांचे पुर्नवसन अद्याप ही करता आले नाही. आळूचा खड्डा परिसर योग्य वाटत नसल्याने व्यवसायिकांनी शहरातील गल्लीबोळात हातगाडे लावून व्यवसाय सुरू केले आहेत. मात्र हि तात्पुरती व्यवस्था असल्याने कायमस्वरूपी जागेसाठी जिल्हाधिकाऱयांच्या अधिपत्याखालील गोडोली,विलासपूरच्या परिसरातील रिकाम्या जागेवर नवी चौपाटी सुरू केल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळेल.
गोडोली चौपाटी झाल्यास वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार नाही, मोठया प्रमाणावर मोकळी जागा असल्याने अधिक विक्रेत्यांना व्यवसाय करता येऊ शकेल. सातारा शहरातील पार्किंगची समस्या वाढणार नसल्याने नव्या चौपाटीला चांगलाच बहर येईल.नगरपालिकेने या ठिकाणी आवश्यक सोईसुविद्या उपलब्ध आणि सुशोभीकरण करून दयावे,अशी मागणी अनेक विक्रेत्यांनी तरूण भारत शी बोलताना केली आहे.
पालिकेने निर्णय घ्यावा
सातारा नगरपालिकेची हद्दवाढ झाल्याने गोडोलीतील विलासपूरकडे जाणाऱया रस्त्यालगत असलेली मोकळी जागा आता पालिकेच्या कक्षेत येते.या ठिकाणी चौपाटी झाल्यास ती अधिक स्वागतार्ह आहे.त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचा पालिका प्रशासनाने तत्काळ निर्णय घ्यावा.
– फिरोजभाई पठाण सामाजिक कार्यकर्ते
चांगला प्रतिसाद मिळेल
वर्षानुवर्षे रिकाम्या असलेल्या जागेचा वापर होत नाही.त्यावर चौपाटी उभारल्यास चांगला प्रतिसाद मिळेल.त्याच बरोबर अनेकांना छोटे व्यवसाय करता येतील.राजवाडयावरील चौपाटीवरील विक्रेत्यांसोबत स्थानिक नवीन विक्रेत्यांची सोय होईल.
– दिनकर मोरे सामाजिक कार्यकर्ते
आम्ही गोडोलीकर सोबत
साताऱयाची हद्दवाढ झाल्याने गोडालीत नव्याने चौपाटी निर्माण व्हावी, बालचमूसाठी खाऊ गल्ली,विविध खेळण्यासाठी स्टॉल याठिकाणी उभारूले जाऊ शकतात.रिकाम्या जागेचा सदुपयोग होईल.नगरपालिकेने यासाठी पुढाकार घ्यावा,आम्ही गोडोलीकर सोबत आहोतचं.
– विलासनाना शिंदे सामाजिक कार्यकर्ते
जागेचा योग्य वापर होईल
चौपाटी म्हणजे अबालवृध्दांचा विरूंगळयाचे ठिकाणी असून शहरात सध्या एक ही असे ठिकाण नाही.गोडोलीतील चौपाटी झाल्याने सर्वांना सोईचे ठिकाण होईल.नगरपालिकेने चांगल्या सोई सुविद्या उपलब्ध केल्यास त्याचा प्रतिसाद चांगला मिळेल.
– सुरज देवडे सामाजिक कार्यकर्ते