ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
अनेक वेळा वादग्रस्त विधान करत चर्चेत राहिलेल्या भाजप नेत्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी परत एकदा एक अजब विधान केले आहे. गोमुत्र हे हाय अँटिबायोटिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भोपाळ मध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे विधान केले आहे. साध्वी प्रज्ञा यांनी असे स्पष्ट केले की, संशोधनातील दाव्यानुसार आम्हाला आढळल आहे की गोमुत्र प्यायल्यास सर्व संसर्गजन्य रोग बरे होतात. असा दावा त्यांनी केला आहे.
सद्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून चर्चेचा विषय ही ठरत आहे. यावर नेटकऱ्यांच्या ही भडक प्रतिक्रिया येत आहेत. साध्वी प्रज्ञा यांनी यापुर्वी अनेकदा गोमुत्राचे महत्त्व स्पष्ट केले आहे. आपण कोरोना संसर्गापासुन वाचलो कारण दररोज गोमुत्राचे सेवन करतो. तसेच फुप्फुसाचा संसर्ग बरा होण्यासाठी ही गोमुत्र गुणकारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपण गोमुत्र प्यायल्यामुळेच तर कोरोनापासून बचावलो असे ही त्या म्हणाल्या.याच बरोबर हनुमान चालीसा म्हटल्याने ही करोना बरा होईल असे ही त्या म्हणाल्या होत्या.असे अजब दावे करत त्या चर्चेत तर राहील्याच त्याचबरोर वादात ही सापडल्या होत्या.
या त्यांच्या वक्तव्यावर अद्याप विरोधी पक्षांनी आपली भुमिका मांडलेली नसली तरी त्यांच्या या दाव्याचा व्हिडीओ असाच व्हायरल होत राहिल्यास यामुद्यावर राजकीय आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.