प्रतिनिधी / बेळगाव
शहरात बऱयाच ठिकाणी पथदीप बंद असल्याने नागरिकांना अंधारातूनच रात्रीचा प्रवास करावा लागत आहे. यामुळे लहान अपघात व चोऱयांचे प्रकार वाढले आहेत. असाच प्रकार गोवावेस ते कलामंदिर मार्गावर दिसून येत आहे. पथदीप व हायमास्ट मागील अनेक दिवसांपासून बंद असूनही ते दुरूस्त करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
शहरातील महत्त्वाचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱया गोवावेस येथे हायमास्ट बंद आहेत. जलतरण तलावासमोरील हा हायमास्ट बंद असल्याने वाहनचालकांना फटका बसत आहे. बऱयाच ठिकाणी स्मार्ट सिटीचे काम अर्धवट स्थितीत असल्याने अपघातही घडत आहेत. एखाद्या निष्पाप व्यक्तीचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गोवावेस ते कलामंदिर या मार्गावर दररोज शेकडो वाहनांची ये-जा असते. या परिसरात अनेक नामांकित ब्रँडची आस्थापने आहेत. परंतु पथदीप व हायमास्ट बंद असल्याने या सर्वांचा फटका येथील व्यापाऱयांनाही बसू लागला आहे. त्यामुळे या मार्गावरील पथदीप व हायमास्ट लवकर सुरू करावेत, अशी मागणी केली जात आहे.