वाळपई प्रतिनिधी
गोवा व कर्नाटक या राज्यांना जोडणारा महत्त्वाचा चोरला घाट परिसरातील रस्त्याच्या कामाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर या रस्त्याची डागडुजी सुरू करण्यात आली असून आता ही डागडुजी संपेपर्यंत या रस्त्याचे काम सुरूच राहणार आहे. त्यानंतर जवळपास 9 कोटी 27 लाख रुपये खर्च 17 कि.मी लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रस्त्याला चांगल्या प्रकारची झळाळी निर्माण होणार असून दोन्ही राज्यांना जोडणारा हा रस्ता प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
याबाबतची माहिती अशी की गोवा कर्नाटक दरम्यानच्या चोरला परिसरातून बेळगाव भागाकडे जाणाऱया रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. पावसाळी मोसमात या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून यामुळे वाहतुकीला अत्यंत समस्या निर्माण होताना दिसत आहेत .या रस्त्यावरून वाहतूक करणे म्हणजे प्रवासी वर्गाला जीव धोक्मयात घालून जावे लागत असून त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशा प्रकारची मागणी नागरिकांनी गेल्या काही महिन्यापासून लावून धरलेली आहे .त्याच प्रमाणे दोन दिवसापूर्वी वाळपई काँग्रेस समितीतर्फे वाळपई सहाय्यक अभियंता यांना निवेदन सादर करून रस्त्याच्या डागडुजीला प्रारंभ करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली होती.
यावेळी सहाय्यक अभियंता देवेंद्र वेलिंगकर यांनी दोन दिवसात कामाला सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याला अनुषंगाने आजपासून या रस्त्याच्या डागडुजीला प्रारंभ झालेला आहे .यासंदर्भात वाळपईचे सहाय्यक अभियंता देवेंद्र वेलिंगकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की या रस्त्याचे कंत्राट एका पुणे येथील कंपनीला प्राप्त झाले असून त्यांनी आजपासून रस्त्याच्या डागडुजी संदर्भाची पूर्वतयारी सुरू केलेली आहे. आवश्यक ती साधनसामुग्री घालण्यास प्रारंभ केला असून उद्यापासून प्रत्यक्ष प्रमाणात कामाला प्रारंभ होणार असल्याचे वेलिंगकर यांनी यावेळी स्पष्ट केले. सदर रस्ता हा साखळी ते चोरला भागातील गोवा हद्दीपर्यंत हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्याला जवळपास 9 कोटी 27 लाख रुपये खर्च करण्यात येणार असून सर्वप्रथम ज्या ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत ते बुजविण्याच्या कामाला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात.हाँटमिक्स करण्याला प्रांरभ होणार आहे. सध्यातरी सदर रस्त्याची रुंदी काही ठिकाणी वाढविण्यात येणार असून या रस्त्याच्या दर्जात्मक कामासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याची यंत्रणा अत्यंत सतर्क असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. सध्यातरी गोवा कर्नाटक राज्यांना जोडणारा अनमोड मार्ग रस्ता हा डागडुजीसाठी बंद असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूक याच रस्त्याने जात असते. मात्र रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यामुळे प्रवासी वर्गा?ची बऱयाच प्रमाणात धांदल उडालेली आहे.
दरम्यान स्थानिक नागरिकांनी या रस्त्याच्या दर्जात्मक कामासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याच्या दर्जात्मक कामासंदर्भात अत्यंत गंभीर असणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. कारण 2013 साली जवळपास आठ कोटी खर्चून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. सदर डांबरीकरण हे दर्जात्मक स्वरूपाचे नव्हते अशा प्रकारची प्रतिक्रिया या रस्त्यावरून सातत्याने भाजीची वाहतूक करणारे मोहंमद बेपारी यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले आहे. सदरवेळी या रस्त्याचे काम दर्जात्मक झाले असते तर आज हा रस्ता अशा अवस्थेत पाहायला मिळाला नसता. त्याचप्रमाणे या रस्त्यावरून सातत्याने स्वस्त धान्य वाहतूक करणारे महादेव बेळगुंदकर यांनी सांगितले की गोवा सरकारने या रस्त्याच्या कामाच्या दर्जा संदर्भात अत्यंत गंभीर होणे गरजेचे आहे. हा रस्ता दोन्ही राज्यांच्या दळणवळण जोडणी संदर्भात महत्त्वाचा आहे. गोव्यातील नागरिक मोठय़ा प्रमाणात बाजारपेठेसाठी बेळगाव या ठिकाणी जात असतात .यामुळे हा रस्ता अत्यंत सुरक्षित व कमी पल्याचा असल्यामुळे बरेच प्रवासी याच रस्त्याचा अवलंब करीत असतात .यामुळे या रस्त्याची डागडुजी व हॉटमिक्स डांबरीकरण दर्जात्मक स्वरूपाची व्हावे अशा प्रकारची मागणी त्यांनी केली आहे.