वार्ताहर/ रामनगर
गोवा-बेळगाव महामार्गावरील खानापूरपासून अनमोड घाटापर्यंत पर्यावरण निमित्त हुबळी परंतु सध्या राहणार बेंगळूर येथील इसमानी पर्यावरण नाश होत असलेले कारण पुढे करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्य़ाने सदर मार्गाचे काम बंद असून सुप्रीम कोर्टात सध्या तारीख पे तारीख मिळत आहे. तर यापूर्वी जुलै महिन्यात दोन तारखा, ऑगस्ट महिन्यात दोन तारखा तर 13 ऑक्टोबर रोजी सुनावरण करण्यात येणार होती. परंतु सदर सुनावणीबाबत सुप्रीम कोर्टात नोटीसही लावण्यात आली नाही. परंतु पुढील सुनावणीबाबत 29 ऑक्टोबर ही तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे तारीख पे तारीख होत असल्याने रस्ता होण्याची आशा मावळण्यात आली आहे. तरी यामध्ये नाहक त्रास वाहनधारक व प्रवाशांना होत आहे. त्यामुळे सध्या तरी या मार्गावर मोठ मोठे खड्डे बुजविणे हा एकच मार्ग राहिला आहे.