प्रतिनिधी / पणजी
सर्वसामान्य जनतेला करांची झळ बसणार नाही . याची काळजी घेत 353.61 कोटी शिलकी अर्थसंकल्प मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत मांडला. एकूण 21056.35 कोटी खर्चाचा हा अर्थसंकल्प आहे. महत्त्वाचे म्हणजे यावेळी फार मोठ्या कोणत्याही नवीन योजनांची घोषणा सरकारने केली नाही
शिक्षण, आरोग्य, कला संस्कृती, वाहतूक या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात साधनसुविधा निर्मितीचे उद्दीष्ट सरकारने ठेवले आहे. त्याचबरोबर दक्षिण गोव्यात पीपीपी पद्धतीने वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे. सेंद्रीय कृषी विद्यापीठ स्थापण्याचेही उद्दीष्ट सरकारने ठेवले आहे.
तंत्र शिक्षणासाठी देण्यात येणार्या प्रशिक्षणार्थी विद्यावेतनाची व्याप्ती वाढवून आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही विद्यावेतन देण्याची घोषणा सरकारने केली आहे. मद्याकावरील करात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 1 एप्रिलपासून याची अंमलबजावणी होणार आहे. स्टॅम्पडयुटी मध्येही वाढ करण्यात आली आहे. प्रतिज्ञापत्र फी वाढविण्यात आली आहे तर दुसर्या बाजूने सरकारने महत्त्वाचे विकास प्रकल्प 2021 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.