गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांचा सवाल : राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी
प्रतिनिधी/ मडगाव
राज्यात दिवसाढवळय़ा शूटआऊटचे प्रकार घडू लागले असून हे राज्यासाठी घातक आहे. सरकारला गोव्याचे उत्तर प्रदेश बनवायचे आहे काय, असा सवाल फातोर्डाचे आमदार आणि गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे. या प्रकरणातील हल्लेखोर अजूनही मोकाट आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याचे यातून सिद्ध होते. आता या निष्क्रिय सरकारला बरखास्त करून राष्ट्रपती रावजट लावण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
गोव्यात दिवसाढवळय़ा असे सुपारी किलिंगसारखे हल्ले बघितलेले नाहीत. असे प्रकार उत्तर प्रदेश व अन्य काही राज्यांत घडतात. मुख्यमंत्री राज्याने मुख्य प्रवाहात सामिल होण्याची आवश्यकता व्यक्त करताना कित्येक वेळा आम्ही ऐकले आहे. हाच तो मुख्य प्रवाहात सामिल होण्याचा प्रकार आहे काय, असा सवालही सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे. गोव्याच्या संस्कृतीत अशा प्रकारे विष कालविण्याचे प्रकार सुरू असल्याची टीका त्यांनी केली आहे.
सांताक्रूझ येथे झालेले सदर शूटआऊट म्हणजे गोव्यासाठी धक्कादायक प्रकार आहे. या हल्ल्यातील हल्लेखोरांना सायंकाळ 7 पर्यंत पकडणे पोलिसांना शक्मय झाले नव्हते. सध्या लॉकडाऊनमुळे 144 कलम लागू असताना नाक्मयानाक्मयावर पोलिसांची गस्त असायला हवी. तरी असता गोळीबार होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येते, अशी टीका सरदेसाई यांनी केली आहे. गोमंतकीयांना स्वतःचे रक्षण स्वतःच करावे लागणार असून सरकारवर भरवसा ठेवणे शक्मय नसल्याने राष्ट्रपती राजवट लावणेच गोव्यासाठी हिताचे ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.