पालिका निवडणुकीत भाजपला कौल
प्रतिनिधी / पणजी
राज्यात नुकत्याच झालेल्या पणजी महानगरपालिकेसह सहा नगरपालीकेंच्या निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश संपन्न केले आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपाने यश मिळविल्या नंतर आता नगरपालिका निवडणुकीतही यश संपन्न केले असल्याने गोव्याची जनता पूर्णपणे भाजपा सोबत असल्याची माहिती भाजपाप्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सांगिले. राज्यातील सरकारचे काम योग्य मार्गाने होत असल्याचा हा एक पुरावा असल्याचेही तानावडे म्हणाले.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परीषदेत तानावडे बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत सभापती राजेश पाटणेकर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, विजमंत्री निलेश काब्राल, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात व अन्य मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना तानावडे म्हणाले की येणाऱया पाच निवडणुकीत भाजपच पुरस्कृत उमेदवारच बाजी मारणार असे आपण ठामपणे सांगत असल्याचेही तानावडे म्हणाले.
कुंकळी पालिका सोडल्यास एकही ठिकाणी काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. त्यमुळे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी मुंगेरीलालची स्वप्ने पाहू नये असा टोमणाही तानावडे यांनी मारला. काही बिगरसरकाररी संस्थाना हाताशी धरून सरकारी कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारच्या कामाला जनतेचा पाठींबा असल्याचे ठामपणे दिसून येत आहेत. जिल्हा पंचायत निवडणुकीबरोबरच नगरपालिका निवडणुकीतही जनतेने भाजपाला पाठीबा दिला आहे. असेही तानावडे यांनी सांगितले.
भाजपाच्याच काही कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे का याबाबत विचारल्या असता तानावडे म्हणाले की काहीजणांनी बंडखोरी केली असून त्यांच्यावर योग्यवेळी कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. कुठल्याही संघटनेत किंवा राजकीय पक्षात काम करताना सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतात असे नाही. काहीवेळा कळ सोसणेही गरजेचे असते, मात्र विरोधकांशी हात मिळणी करेणे चुकीचे आहे असेही तानावडे यांनी सांगितले.
साखळी येथील पोटनिवडणुकीत भाजप पुरस्कृत उमेदवाराचा पराजय झाला असून याबाबत विचारले असता. तानावडे म्हणाले जो विजय मिळविला त्याचा आनंद घ्या जो उमेदवार हरला त्याच्यावर आम्ही चिंतन करू कुंकळी पालिकेतही भाजप पुरस्कृत उमेदवार हरले असल्याने त्याबाबतही आम्हाला आत्मचितंन करणे गरजेचे आहे असेही तानावडे यांनी सांगितले.