प्रतिनिधी / बांदा:
सावंतवाडीहून काम आटोपून गोव्याकडे जाताना वाटेत हृदयविकाराच्या तीव्र झटक्मयाने रसुल अब्दुल शेख (49 रा. फोंडा-गोवा) यांचा मृत्यू झाला. शेख कुटुंबीय कारने गोव्याकडे जात असताना ही दुर्घटना शनिवारी सायंकाळी उशिरा घडली. नातेवाईकांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरेश पटवर्धन यांनी रसुल शेख यांना मृत घोषित केले. रविवारी वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. बांदा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.