प्रतिनिधी /मडगाव
दिवाळीच्या पूर्वसंध्येला मडगाव नगरपालिकेने घनकचऱयावर प्रक्रिया करणाऱया 5 टीपीडी ‘बायो-मिथेनेशन’ प्लांटचे उद्घाटन केले. बायो-मिथेनेशन तंत्रज्ञान हे घनकचरा व्यवस्थापनाच्या समस्यांचे उत्तर आहे का ? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. गोव्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्लांट आहे. अनेक दशकांपासून मडगाव पालिकेसमोर कचऱयाची गंभीर समस्या उभी ठाकली होती. या समस्येवर उपाय म्हणून पहिले पाऊल उचलले आहे.
घनकचऱयाच्या व्यवस्थापनाला उत्तर म्हणून बायो-मिथेनेशन तंत्रज्ञानाचे भवितव्य ठरवेल. मडगाव नगरपालिकेच्या वतीने नजीकच्या भविष्यात आणखी दोन 5 टीपीडी बायो-मिथेनेशन प्लांट उभारले जाणार आहेत. येत्या काही दिवसांत सोनसोडो येथे मेगा 25 टीपीडी बायो-मिथेनेशन प्लांटच सुरू केली जाणार आहेत. हे दोन प्लांट सरकारच्या विचाराधीन आहे.
90 च्या दशकाच्या उत्तरार्धात पुणे स्थित मेसर्स कॉमेक्स अभियांत्रिकीच्या सहाय्याने बायो-मिथेनेशन तंत्रज्ञानाचा वापर करून कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी मडगाव पालिकेने गेल्या दोन दशकांपासून प्रयत्न चालविले होते. कचऱयग्नाच्या ज्वलंत समस्येचे निराकरण करण्यासाठी हे प्रकल्प उपयोगी ठरणार आहेत.
बायो-मिथेनेशन प्लांचे उद्घाटन मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, नगराध्यक्ष लिंडन परेरा तसेच उपनगराध्यक्ष दिपाली सावळ व मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री. कामत म्हणाले की, आज, मडगाव नगरपालिका 5 टीपीडी बायो-मिथेनेशन प्लांट सुरू करून एक छोटेसे पाऊल उचलत आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला ही एक चांगली सुरुवात आहे. जेव्हा हा प्लांट यशस्वी होईल, त्यानंतर पालिका 25 टीपीडी प्लांटसाठी पुढाकार घेणार आहे.
फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी मेसर्स कॉमेक्स प्लांटपासून सुरुवात केलेल्या कटू भूतकाळातील अनुभवाचे स्मरण केले. परंतु ते म्हणाले की, बायो-मिथेनेशन तंत्रज्ञान कचरा समस्येवर उपाय देऊ शकते. ‘मडगाव पालिकेने गोव्यातील पहिला 5 टीपीडी बायो-मिथेनेशन प्लांट सुरू करून एक टेंड सेट केला आहे. जर तंत्रज्ञान यशस्वी झाले, तर आम्ही त्वरित उर्वरित दोन प्लांट कार्यान्वित करण्यासाठी पुढाकार घेणार आहोत. यामुळे शहराला मोठा दिलासा मिळेल. मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस म्हणाले की, ‘मडगावचा पहिला 5 टीपीडी बायो-मिथेनेशन प्रकल्प स्वयंचलित स्कम ब्रेकिंग यंत्रणेसह प्रगत तंत्रज्ञानासह 5,000 किलो प्रतिदिन अन्न, मासे, भाजीपाला, चिकन कचरा इत्यादीवर प्रक्रिया करणार आहेत. तंत्रज्ञान यशस्वीरित्या सिद्ध झाल्यास एसजीपीडी मार्केटमध्ये आणखी दोन प्लांट जोडण्याची पालिका मंडळाची योजना आहे. उर्जा बायो-सिस्टम एजन्सी हे पाच वर्षासाठी प्लांट चालवेल आणि त्याची देखभाल करेल.