वाढल्या रुग्णांमुळे जनतेत कमालीची अस्वस्थता : विरोधी पक्षाचा सरकारवर हल्लाबोल : रेल्वे, रस्ता वाहतूक बंद करण्याचा आग्रह
प्रतिनिधी / पणजी
गोव्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आणि त्याची एकूण संख्या 35 झाल्याने गोमंतकीय जनता चिंताग्रस्त व भयभीत झाली आहे. राज्यातील सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक बंद करावी तसेच गोवा पुन्हा एकदा पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात यावा, अशी मागणी पुढे येत आहे. गोव्यात येणाऱयांना अशीच जर सवलत मिळत राहिली तर राज्य कोरोनाचा हॉटस्पॉट होण्यास वेळ लागणार नाही, अशी भितीदायक प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेमधून उमटत आहे. राज्यात सुरू झालेल्या रेल्वेगाडय़ा गोव्यासाठी आत्मघातकी ठरल्या आहेत. रेल्वेमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.
मुंबई-गोवा, दिल्लाöगोवा अशा रेल्वे सुरू करून आणि रस्तामार्गे येणाऱयांना पास देऊन सीमा खुल्या केल्यामुळे कोरोनाचे हे दुखणे विनाकारण गोव्याने ओढवून घेतल्याची चर्चा जनतेमध्ये सुरू आहे. घोव्यात सात पॉझिटिव्ह कोरोना रुग्ण होते तेव्हा सर्व व्यवहार बंद करून पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले होते, परंतु आता या रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढून चाळीशीकडे पोहोचत आली तरीही राज्यातील सर्व व्यवहार, जनजीवन नित्याप्रमाणे पूर्ववत सुरूच आहे. त्यात कोणताही खंड पडलेला नाही. बाहेरुन येणाऱया वाहनांद्वारे अन्य राज्यांतून येणाऱयांची संख्याही वाढतच आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या अजूनही वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
रुग्ण वाढले तर सकार काय करणार?
गोमंतकीयांनी घाबरू नये. ते रुग्ण गोव्याबाहेरील असून आयात झालेले आहेत. त्यांचा कोणाशी संपर्क आलेला नाही, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे करतात. त्याला काहीच अर्थ नाही. हे असेच रुग्ण वाढत राहिले तर सरकार काय करणार? अशी विचारणा सामान्य जनतेमधून केली जात आहे.
रुग्ण आण्ण्यासाठीच रेल्वे सुरु केल्याची टीका
दिल्ली व मुंबई येथून गोव्यासाठी सुरू करण्यात आलेली रेल्वे सेवा आता राज्यासाठी कोरोना सेवा ठरू लागल्याचे समोर येत आहे. इतकेच नव्हे तर ते सिद्धही होत आहे. गोवा कोरोनामुक्त होता, ग्रीन झोन होता. मुंबईचे लोक येऊ लागल्यानंतर आणि गोव्यात रेल्वे सुरू झाल्यानंतर कोरोना रुग्ण वाढले. त्यामुळे ती रेल्वेही कोरोनाबाधित झाली आहे. गोव्यात कोरोनाचे रुग्ण यावेत म्हणूनच रेल्वे सेवा सुरु केलीय की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. कोरोनामुक्त राज्य व ग्रीन झोनमुळे सुरक्षित असणारी गोमंतकीय जनता आता आता संकमटात पडल्याने चिंताग्रस्त बनली आहे.
रेल्वेसेवा गोव्यासाठी बनतेय कोरोना एक्सप्रेस
गोव्यात चालू करण्यात आलेली रेल्वे आता राज्याकरीता कोरोना एक्स्प्रेस ठरल्याचे दिसून येत आहे. त्या रेल्वेतून येणारे काही प्रवासी कोरोनाबाधित मिळत असून ती रेल्वे म्हणजे गोव्यासाठी मोठे संकटच ठरले आहे. एकाही रुग्ण नसलेल्या गोव्यात आता तब्बल 42 रुग्ण आहेत, याला रेल्वे मोठय़ा प्रमाणात कारणीभूत आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. रेल्वे स्थानकावर उतरणाऱया सर्वच प्रवाशांची तपासणी होतेय की नाही, याबाबतही संशय आहे. काही प्रवासी डब्यातून उतरतात आणि मिळेल त्या बाजूने धूम ठोकत असल्याचीही माहिती आहे. दिल्लीहून तसेच मुंबईहून येणारी रेल्वे म्हणजे गोव्यासाठी कोरोना एक्सप्रेस ठरली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया लोकांमधून व्यक्त हेत आहे.
रस्तामार्गे कोरोनावाहू चालक पोहोचले गोव्यात
रस्तामार्गेही मुंबईचे अनेक लोक गोव्यात येत असून त्यांच्यापासूनही गोव्याला धोका होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. मालवाहू ट्रक व त्यांचे कोरोनावाहू चालकही गोव्यात सहजपणे पोहोचत आहेत. असे चालक थेट पणजी शहर तसेच फोंडा शहरापर्यंतही पोहोचले आहेत. त्यामुळे गोव्याकडे येणारे वाहतुकीचे सर्व मार्ग बंद करावेत, अशी मागणी आता जोर धरून पुढे येत आहे. या वाढत्या कोरोना रुग्णांवरून विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.