वार्ताहर/ वरकुटे
डिजिटल भारत योजनेअंतर्गत सर्व ग्रामपंचायती डिजिटल करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यापूर्वी ग्रामपंचायतींचा सर्व कारभार कागदपत्रांच्या सहाय्याने चालत होता. पत्रव्यवहार त्यातील मुख्य घटक होता. पण त्यामुळे ग्रामपंचायतीचा गाडा रखडत चालत होता.
किरकोळ कामासाठी लोकांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत होते. त्यातच सध्या एका एका ग्रामसेवकाकडे कमित कमी दोन व जास्तीतजास्त चार ग्रामपंचायतीचा कारभार असल्याने व त्यातुन तालुक्याच्या गावी आठवडय़ातुन एक दोन वेळा मिटिंग असल्याने ग्रामस्तांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.
या सर्व प्रकारावर मात करुन ग्रामस्तांना त्यांची कामे विनाविलंब करुन देण्यासाठी शासनाच्या वतीने सर्व ग्रामपंचायती डिजिटल करण्यात येणार आहेत.त्याचाच भाग म्हणून वरकुटे व परिसरात ओ एफ सी ( आँप्टिकल फायबर केबल) टाकण्याचे काम वेगात सुरु आहे. हे काम एअरटेल ही दळणवळण क्षेत्रातील नामांकित कंपनी करीत असुन त्याचवेळी या कंपनीचे मोबाईल टॉवर एकमेकांशी ओ एफ सी ने जोडण्याचे कामही करण्यात येत आहे.
यामुळे ग्रामीण भागात एअरटेलचे जाळे अजूनही मजबुत होण्यास मदत होणार आहे.