प्रतिनिधी/बेळगाव
किमान वेतन द्यावे, वेळेत बदल करावा तसेच इतर मागण्यांसाठी बेळगाव जिल्हा सरकारी ग्रामपंचायत ग्रंथपालांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले. जर या मागण्या मान्य केल्या नाही तर 28 सप्टेंबरपासून आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही ग्रामपंचायतमधील वाचनालयामध्ये काम करत आहोत. मात्र, आम्हाला अद्याप किमान वेतन लागू करण्यात आलेले नाही. सध्या सकाळी 9 ते 11 व दुपारी 4 ते सायंकाळी 6 हा वेळ वाचनालय सुरू करण्यासाठी दिला आहे. मात्र, त्यामध्ये बदल करून सकाळी 9 ते 1 व दुपारी 3 ते सायंकाळी 6 असा वेळ करावा. कामावर असताना काही जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष बसवराज इराप्पा पणदी, रमेश कृष्णा पडव, मारुती चुन्नाप्पा ढवळी, मारुती गंगाप्पा मल्लप्पगोळ यांच्यासह ग्रंथपाल उपस्थित होते.