प्रतिनिधी/ रत्नागिरी
गावागावांमध्ये दोन आठवडय़ांपासून ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने चांगलीच भावबंदकी रंगली आहे. प्रचाराने चांगलीच गतीही घेतली असताना दुसऱया बाजूने प्रशासकीय यंत्रणेचीही तयारी जोमात सुरू आहे. रत्नागिरी तालुक्यातील निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या तब्बल 800 हून जास्त अधिकारी व कर्मचाऱयांना मतदान यंत्र हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
रत्नागिरी तालुक्यातील 53 ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता, मात्र यातील 12 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून आता 41 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे. येथील सावरकर नाटय़गृहात निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱयांच्या प्रशिक्षणाची दुसरी फेरी आयोजित करण्यात आली होती. रविवारी सकाळपासून या प्रक्रियेस सुरूवात झाली. त्यात प्रथम मतदान यंत्र, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट आणि अशा सर्व तांत्रिक बाबींची अशा सर्व तांत्रिक बाबींची माहिती देण्यात आली. त्यानंतर त्याची हाताळणी कशी करायची, सुरू अथवा बंद कसे करायचे, मतदानाला सुरूवात करण्यापूर्वी काय करावे, मतदान प्रक्रिया संपल्यानंतर काय करायचे, अशी सर्वच टप्प्यांची माहिती आली.
हा प्रशिक्षणाचा पहिला टप्पा होता. तो पार पडल्यानंतर आता मतदान केंद्रावर जाताना पोलिंग पार्टीला प्रशिक्षण देण्यात येईल. 14 जानेवारीला मतदानाच्या आदल्या दिवशीही त्यांच्यासाठी प्रथम मॉकपोल घेण्यात येईल. त्यानंतर मतदानाच्या अर्धा तास आधी यंत्र योग्य चालत असल्याची खात्री उमेदवारांना करून दाखवल्यानंतर प्रत्यक्षात मतदान प्रक्रियेस सुरूवात होईल. त्यानुसार सर्वच मतदान केंद्र अध्यक्ष आणि मतदान अधिकाऱयांनी काळजी घ्यावी, अशा सूचना यावेळी तहसीलदारांच्यावतीने देण्यात आल्या. दरम्यान इतर तालुक्यांतही प्रक्रिया सुरू असून काही तालुक्यातील पहिला टप्पा पूर्णही झाला असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
पहिल्या फेरीत उडाला होता गोंधळ
गेल्या रविवारी शहरातील सावरकर नाटय़गृहामध्ये ग्रामपंचायत निवडणूक प्रशिक्षणाच्या दुसऱया फेरीच्या नियोजनात गोंधळ उडाला होत़ा एकाच छताखाली मोठय़ा प्रमाणामध्ये प्रशिक्षणार्थी कर्मचारी जमल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला होत़ा