वाऱयामुळे आंबेवाडी, मण्णूर परिसरातील घरांवरील उडाले पत्रे : अनेक ठिकाणी झाडांसह विद्युतखांब कोसळले, साऱयांचीच उडाली तारांबळ
प्रतिनिधी /बेळगाव
शहराच्या काही भागामध्ये पावसाचा शिडकावा झाला तर ग्रामीण भागामध्ये जोरदार वाऱयासह पावसाचे आगमन झाले. यामुळे आंबेवाडी, मण्णूर या परिसरातील घरांवरील पत्रेदेखील उडाले आहेत. जोरदार वारा आणि गारा कोसळल्या. यामुळे दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागली. शिवारात असलेल्या शेतकऱयांनाही या गारांमधूनच घर गाठावे लागले. गेल्या काही दिवसांपासून जोरदार वाऱयासह पावसाचे आगमन होत आहे. त्यामुळे झाडे उन्मळून पडणे, फांद्या तुटून पडणे, हेस्कॉमचे खांब कोसळणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
शुक्रवारी दुपारीच ढगाळ वातावरण निर्माण होऊन शहरातील काही भागांमध्ये पावसाचा शिडकावा झाला. शहराच्या पश्चिम भागामध्ये मात्र जोरदार वाऱयासह पावसाचे आगमन झाले. यामुळे साऱयांचीच तारांबळ उडाली. दुचाकीस्वारांनी तातडीने वाहने रस्त्यावरच पार्किंग करून आडोसा शोधला. शहरावरही जोरदार पाऊस पडेल, अशी शक्मयता होती. मात्र वाऱयाने शहराच्या पश्चिम भागातील ग्रामीण भागात जोरदार पाऊस कोसळला आहे.
आंबेवाडी व अलतगा रस्त्यावरील घळगू पिराजी काकतकर आणि आंबेवाडीकर यांच्या घरावरील पत्रे उडून लांबवर गेले आहेत. आंबेवाडी-शांतीनगर येथील बाळू तरळे यांच्या घरावरीलही पत्रे उडून गेले आहेत. यामुळे मोठे नुकसान झाले असून सुदैवानेच या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. पावसापेक्षा वाऱयाला अधिक जोर असल्याने मण्णूर रस्त्यावर झाडदेखील कोसळले. एकूणच शुक्रवारी वाऱयामुळे पुन्हा नुकसान झाले आहे.
या पावसामुळे ग्रामीण भागातील काही शिवारात पाणी झाले होते. ढगाळ वातावरण व पावसाच्या शिडकाव्यामुळे शहरातील रस्त्यांवरील व्यापाऱयांचीही तारांबळ उडाली. गेल्या चार दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली होती.
हेस्कॉमचे मोठे नुकसान
शुक्रवारी जोरदार पावसामुळे आंबेवाडी-मण्णूर परिसरातील जवळपास 14 हून अधिक विद्युतखांब कोसळले. त्यामुळे हेस्कॉमचे मोठे नुकसान झाले असून विद्युतखांब पडल्याने बराचवेळ विद्युतपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली होती. सध्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी हेस्कॉमच्या कर्मचाऱयांनी शर्थीचे प्रयत्न करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.