नवी दिल्ली : केंद्र सरकारने प्रादेशिक ग्रामीण बँकांना (आरआरबी) 670 कोटी रुपयाचे भांडवल उपलब्ध करुन दिलेले आहे. संकटाच्या काळात कृषी आर्थिक क्षेत्रासाठी महत्वाची भूमिका असल्यामुळे आरआरबीची भांडवल स्थिती मजबूत करण्यासाठी केंद्राने हे पाऊल उचलले असल्याची माहिती आहे. यामध्ये 43 आरआरबीमधील एक तृतीयांश आरआरबी तोटय़ात आहेत. व जास्तीत जास्त पूर्व क्षेत्रातील प्रादेशिक बँका असल्याचे सुत्रांनी दिलेल्या माहितीतून सांगितले आहे. आरआरबीयाला 9 टक्क्यांच्या नियामक पातळीवर भांडवलाची नितात गरज असून त्याची पूर्तता करण्यास मदतीची आवश्यकता आहे. आरआरबीच्या पुनर्भांडवलीकरणाची सद्याची योजना ही आरआरबी बँकांना केंद्र, संबंधीत राज्य सरकार तसेच प्रायोजक बँकांशी संबंधीत भांडवलास समर्थन करणारे असल्याची माहिती आहे. या मदतीनेच आरआरबी बँका 9 टक्क्यांचे भांडवलाची जोखिम भारित परिसंपत्ती अनुपातास (सीआरएआर) पूर्ण करु शकण्याचा अंदाज आहे. सदरच्या प्रायोजक बँकासह अन्य राज्याकडून आरआरबीसाठी विशेष निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या(नाबार्ड) आकडेवारीनुसार 31 मार्च 2020 रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षात आरआरबीला सामूहिक स्वरुपात 2,206 कोटी रुपयाचा तोटा झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
Previous Articleअरुणाचल सीमेजवळ चीन उभारणार रेल्वे प्रकल्प
Next Article ऑक्टोबरमध्ये वाहन कंपन्याची कामगिरी तेजीत
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.