आंबेवाडी, मण्णूर, तुरमुरी, कंग्राळी परिसरात भाजपची प्रचारफेरी
प्रतिनिधी / बेळगाव
ग्रामीण भागामध्ये भाजपने जोरदार प्रचार सुरू केला आहे. मंत्री जगदीश शेट्टर यांच्या नेतृत्वाखाली आंबेवाडी, मण्णूर, तुरमुरी, कंग्राळी, गणेशपूर, सावगाव या परिसरात जोरदार प्रचार केला. बऱयाच ठिकाणी जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद भाजपला दिला आहे.
या सर्व गावांमध्ये जाऊन कॉर्नर सभांसह प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. भाजपने आजपर्यंत केलेले कार्य याची माहिती दिली आहे. सर्वच ठिकाणांहून भाजपला भरघोस पाठिंबा मिळत आहे. भाजपने आजपर्यंत कोणत्याही प्रकारे जनतेची फसवणूक केली नाही. त्यामुळे निश्चितच भाजपचा उमेदवार विजयी होणार आहे. तेंव्हा मंगला अंगडी यांना मतदान करावे, असे आवाहन केले आहे.
दिवंगत पेंद्रीय रेल्वेराज्य मंत्री सुरेश अंगडी यांनी आजपर्यंत बेळगावसह उत्तर कर्नाटकामध्ये विविध विकास कामांसाठी केंद्राकडून निधी मंजूर करून आणण्यात आला आहे. ती सर्व कामे अर्धवट आहेत. ती कामे पूर्ण करण्यासाठी भाजपला मतदान करणे महत्त्वाचे आहे. तेंव्हा भाजपचा उमेदवार आणि दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी यांनाच मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी मंत्री जगदीश शेट्टर, खासदार इराण्णा कडाडी, माजी आमदार संजय पाटील, माजी मंत्री शशिकांत नाईक, माजी आमदार मनोहर कडोलकर, विनय कदम, श्रीकांत थोरवत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.