लाखो रुपयांचा निधी वाया : नागरिक शुद्ध पाण्यापासून वंचित : अनेक गावांमध्ये यंत्रणा धूळखात, दुरुस्तीची मागणी
आण्णाप्पा पाटील /बहाद्दरवाडी
तालुक्मयाच्या अनेक गावांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रणा आहे. मात्र बहुतांशी गावातील यंत्रणा बंद अवस्थेत आहेत. लाखो रुपयांचा निधी खर्च होऊनही ग्रामीण भागातील जनता मात्र शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचितच राहिली आहे.
सध्या काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. जलनिर्मल योजनेंतर्गत काही ठरावीक गावांमध्ये शुद्ध पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र हा पाणीपुरवठाही व्यवस्थितपणे सुरू नसल्याच्या तक्रारी होत आहेत. काही गावांमधील चौक, एखाद्या गल्लीच्या मध्यभागी जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामध्ये एक रुपयाचे नाणे टाकून दहा लिटर शुद्ध पाणी मिळते, असे प्रशासनाने स्पष्ट केले होते. पण बहुतांशी गावात ही यंत्रणा धूळखात पडली असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे.
काही मोजक्मयाच गावांमध्ये प्रारंभीच्या काळात एक-दोन महिने इतकेच पाणी मिळाले. त्यानंतर मात्र या योजनेकडे अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पुन्हा विहीर व कूपनलिकेचे पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे. ग्राम पंचायतीमार्फत भागातील या जलशुद्धीकरण यंत्रणेद्वारे नागरिकांना पाणी मिळण्यासाठी प्रयत्न होणार का? अशा प्रतिक्रिया तालुक्मयाच्या नागरिकांतून व्यक्त करण्यात येत आहेत.
ग्रामीण भागात आजाराचे प्रमाण वाढत आहे. अशुद्ध पाणी हे विविध आजारांचे मूळ कारण आहे. गतवषी मान्सून अधिक झाला होता. यावेळी दूषित पाणीपुरवठा झाल्यामुळे डेंग्यू, मलेरियासारख्या रोगराईनेही डोके वर काढले होते.
प्राथमिक आरोग्य केंद्रांनी पाण्याची तपासणी करावी
एखाद्या गावात रोगराई पसरल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी पंधरा दिवस, महिनाभर नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करतात. पण त्यात सातत्य रहात नाही. भागात असणाऱया प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्येक गावातील पिण्याच्या पाण्याची तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र, गावातील ग्राम पंचायत सदस्य याकडे दुर्लक्ष करतात. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. ग्रामीण जनतेला शुद्ध पाणी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी बसवण्यात आलेली जलशुद्धीकरण यंत्रे ही नियमितपणे चालू पाहिजेत. केवळ निधी लाटण्यासाठी काही गावात यंत्रणा बसविण्यात आली आहे. इतका पैसा खर्च करूनही शुद्ध पाणी का मिळत नाही, असा प्रश्न ग्रामीण जनता करीत आहे. लोकप्रतिनिधींनी काही गावांमध्ये असणाऱया जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करून संबंधित अधिकाऱयांना याबाबत जाब विचारावा, अशी मागणी होत आहे.
जलशुद्धीकरण यंत्रणा ज्या खोल्यांमधून आहेत, त्यांच्या भिंतीवर व काचांवर विविध जाहिराती चिकटवण्यात येत आहेत. या यंत्रांमधून पाणी तर मिळत नाही मात्र काही जणांच्या प्रसिद्धीसाठी जाहिराती लावण्याचे ठिकाण ते बनू लागले आहे. पिरनवाडी येथे जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ही यंत्रणा बंद आहे. ग्राम पंचायतीच्या लगतच असलेली ही यंत्रणा बंद पडली आहे.
येत्या महिनाभरानंतर तालुक्मयाच्या अनेक गावातील नागरिकांना पाणीसमस्येचा सामना करावा लागणार आहे. गावात पाणी मिळत नसल्याने काही महिला व नागरिक आजूबाजूला असलेल्या शिवारातील विहिरींचे पाणीही पिण्यासाठी वापरतात. अशावेळी जर विहिरींचे पाणी जलशुद्धीकरण यंत्रणेमध्ये सोडून ते पाणी शुद्धीकरण करून नागरिकांना पिण्यासाठी दिल्यास नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने हिताचे ठरू शकते.
ग्राम पंचायत सदस्यांनी पुढाकार घ्यावा
जलशुद्धीकरण यंत्रणेसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला आहे. मात्र, निधी खर्च करूनही नागरिकांना शुद्ध पाणी मिळते की नाही, हे तपासण्याची सोय हवी किंवा याची पाहणी संबंधित खात्याच्या अधिकाऱयांनी करणे गरजेचे आहे. ग्रा. पं. सदस्यांनी नागरिकांना शुद्ध पाणी मिळवून देण्यासाठी आता प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.
विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळू शकते
शाळा नियमितपणे सुरू झालेल्या आहेत. बहुतांशी गावात शाळांच्या आजूबाजूलाही जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आली आहेत. जर या यंत्रांमधून शुद्ध पाणी मिळाले तर विद्यार्थ्यांनाही शुद्ध पाणी मिळू शकते.
तीन वर्षांपासून जलशुद्धीकरण यंत्र बंदच
आमच्या गावात बेळगुंदी-राकसकोप रोडच्या बाजूला जलशुद्धीकरण यंत्र बसविले आहे. मात्र, सध्या बंद पडले आहे. दोन-तीन वर्षांपासून यामधून पाणी आलेच नाही. जर शुद्ध पाणी मिळत नसेल तर अशी यंत्रणा बसविण्याचे सोंग कशासाठी करावे? ही यंत्रणा सुरू झाल्यास नागरिकांना शुद्ध पाणी मिळणार आहे. बेळगुंदीसह राकसकोप रस्त्यावरून ये-जा करणाऱया नागरिकांनाही या यंत्रणेचा फायदा होऊ शकतो.
– अरुण मोटणकर, बेळगुंदी
अधिकाऱयांनी दखल घ्यावी
पिरनवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या बाजूलाच जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले आहे. मात्र सध्या गेल्या काही महिन्यांपासून ही यंत्रणा बंद पडली आहे आणि या जलशुद्धीकरण केंद्राच्या आजूबाजूलाच झाडेझुडुपेसुद्धा वाढलेली आहेत. वरि÷ अधिकाऱयांनी याची पाहणी करून हे जलशुद्धीकरण यंत्र पुन्हा सुरू करण्यात यावे.
– विजयानंद नेसरकर