कुरुंदवाड प्रतिनिधी
क्रिकेटमुळे कनेक्टिव्हिटी वाढते, माणसे जोडली जातात, आयपीएलमुळे भारतीय खेळाडूंना अत्यंत चांगल्या दर्जाच्या परदेशी खेळाडू बरोबर खेळायला मिळत आहे. यामुळे नवीन टॅलेंटला वाव मिळतो आयपीएलमुळे पैसा मिळतो तसेच आयपीएलच्या एका संघात अकरा खेळाडूंचा असतात यापैकी तीन ते चार खेळाडू परदेशी असतात मात्र अन्य सात ते आठ खेळाडू भारतीय असतात यामुळे प्रमुख खेळाडूंना वाव मिळतो असे मत अंतरराष्ट्रीय क्रिकेट समालोचक सुनंदन लेले यांनी कुरुंदवाड येथे व्यक्त केले.
ते येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या माजी विद्यार्थी पोर्टलच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष उद्योगपती हर्षवर्धन फडणीस होते तर नूतन मराठी विद्यालय पुणेचे माजी मुख्याध्यापक पळशीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी क्रिकेटपटू सुदीप फाटक यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली.
ते म्हणाले भारतीय आणि महाराष्ट्र महिला संघाला नितांत खेळाडूची गरज आहे क्रिकेटमध्ये हे खास करून निमशहरी ग्रामीण भागातील मुली खेळण्यासाठी पुढे आल्या व त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली तर भारतीय संघ त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी बोलवून घेणे गरजेच आहे कारण आज मुलांमध्ये जेवढे क्रिकेट टॅलेंट आहे तेवढे मुलींमध्ये नाही. त्यामुळे या खेळात नाव कमवण्यासाठी मुलींनीही थोडे आले पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.