प्रतिनिधी/ सातारा
ग्रामीण भागात कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव पहाता नागरिकांना आवर घालण्यासाठी कंटेंटमेंट झोन करण्यात येत आहे.या कंटेंटमेंट झोन बाबत ग्रामीण भागात नाराजी व्यक्त केली जात आहे.जो बाधित आढळून येतो आहे त्याचेच घर फक्त बंद करा, अख्खा गाव वेठीला धरू नका, उगाच इतर नागरिकांना वेठीला धरत आहात, असा आरोप तारळे येथील रवींद्र लाहोटी यांनी केली आहे. ग्रामीण भागात प्रत्येक गावात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.जो नियम शहरी भागात राबवला जात आहे तोच निर्णय ग्रामीण भागात राबवला गेला पाहिजे.काही गावे ही चार पाचशे लोकसंख्या असलेली असतात तर काही वस्त्या 12 ते पंधरा घरच्या असतात.एखादा बाधित आढळून आला की सर्वच बंद केले जाते ते 28 दिवसाकरता.त्या 28 दिवसात जो बाधित आहे तो बरा होऊन हिंडू फिरू लागतो तरीही ते गाव सील बंद असते. पाटण तालुक्यातील तारळे गावासह भागात हीच परिस्थिती आहे.त्या मायक्रो कंटेंटमेंट झोनचे स्वरूप बदलण्याची मागणी भाजपचे रवींद्र लाहोटी यांनी केली आहे.