केंद्राची ग्रामीण जनतेला सुविधेचा लाभ देण्याची योजना बारगळली : राष्ट्रीयीकृत बँकांच्या सेवेपासून नागरिक वंचित
प्रतिनिधी/ चिकोडी
चिकोडी विभागात 8 तालुक्मयांचा समावेश असून एकूण 264 ग्राम पंचायती आहेत. त्यापैकी केवळ 115 ग्राम पंचायत कार्यक्षेत्रामध्ये राष्ट्रीयीकृत बँका व केवळ 58 ठिकाणी एटीएम केंदे आहेत. यामुळे केंद्र सरकारची ग्रामीण जनतेला राष्ट्रीयीकृत बँकांच्या आर्थिक सुविधेचा लाभ देण्याची योजना बारगळली आहे. तसेच राष्ट्रीयीकृत बँका नसल्याने नागरिकांना शासकीय सवलतींपासून वंचित रहावे लागत असून इतर ग्रा. पं. तीकडे वळावे लागत आहे.
गत दहा वर्षांपासून केंद्र सरकारने ग्रामीण भागात राष्ट्रीयीकृत बँका स्थापन करण्याचा खटाटोप सुरू केला आहे. पण, ग्रामीण भागात या बँका पोहोचविण्यात अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. केंद्र व राज्य सरकारकडून बहुतांशी योजनेतील सवलत व मदतनिधीची रक्कम लाभार्थींच्या थेट राष्ट्रीयीकृत बँकेच्या खात्यावर जमा करण्यात येते. त्यामुळे प्रत्येक खेडय़ात या लाभार्थींची सोय व्हावी, यासाठी प्रत्येक ग्रा. पं. कार्यक्षेत्रात किमान एक राष्ट्रीयीकृत बँक असावी, हे धोरण ठरवून केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून देशातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांना आपल्या शाखा ग्रामीण भागात विस्तारण्याची सूचना केली होती.
पण, राष्ट्रीयीकृत बँकांनी याकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही. अशातच गत दोन वर्षात अनेक राष्ट्रीयीकृत बँकांचे विलिनीकरण करण्यात येत आहे. यामुळे ही प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने नव्या शाखा काढण्याचे बँकांनी सोडून दिले आहे. आहेत त्या शाखा कार्यरत ठेवणे किंवा त्यातील काही शाखा गोठवणे, असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक राष्ट्रीयीकृत बँकांच्या सेवेपासून वंचित राहत आहेत. काही राष्ट्रीयीकृत बँकांनी नावापुरत्या काही खेडय़ात शाखा सुरू करून रिझर्व्ह बँकेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले आहेत.
बहुतांशी बँकांनी मात्र ग्रामीण भागाकडे पाठ फिरवली आहे. राष्ट्रीयीकृत बँका ग्रामीण भागात असल्यास गॅस सबसिडी, घरकुल लाभार्थींची रक्कम, किसान सन्मान तसेच राज्य सरकारच्यावतीने देण्यात येणारे शेतकऱयांचे अनुदान, कृषी खात्याच्या योजनांच्या लाभासाठी पैसे जमा करणे, सरकारी नोकरी मिळविण्यासाठी चलन भरणे, याशिवाय केंद्र सरकारच्या अटल पेन्शन व विमा योजनेसाठी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणे आवश्यक असते. पण, दहा वर्षे प्रयत्न करूनही ग्रामीण भागात प्रत्येक ग्रा. पं. कार्यक्षेत्रामध्ये अद्यापही राष्ट्रीयीकृत बँका पोहोचल्या नसल्याचे विदारक चित्र जिल्हय़ात दिसून येत आहे.
चिकोडी विभागात एकूण 264 ग्रा. पं. ती असून केवळ 115 ग्रा. पं. कार्यक्षेत्रामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा आहेत. तर केवळ 58 ग्रा. पं. मध्ये एटीएम केंदे सुरू आहेत. त्यामुळे निम्म्याहून अधिक ग्रा. पं. कार्यक्षेत्रामधील नागरिकांना राष्ट्रीयीकृत बँकेच्या सेवेसाठी बँक असलेल्या दुसऱया ग्रा. पं. तीकडे वळावे लागत आहे.