प्रतिनिधी / बेळगाव :
गुरूवारी दुपारी शहरासह ग्रामीण भागातील बहुतांशी भागात वळीव पावसाने जारेदार हजेरी लावली. गेल्या आठदिवसांपासून मोठय़ा प्रमाणात उष्णतेत वाढ होऊन पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला. ग्रामीण भागातील बहुतांशी ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे.
हवामान बदल होऊन ढगांचा गडगडाट व विजांचा कडकाडाटासह आलेल्या पावसाने चांगलेच झोडपले. त्यामुळे शिवारात काही भागात पाणीच पाणी होऊन सखल भागात पाणी साचले होते. दमदार पाऊस झाल्याने पेरणी पूर्व मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात दोन वेळा झालेल्या वळीव पावसाने शेतकरी पेरणी पूर्व मशागतीच्या कामात गुंतला होता. गेल्या आठ दिवसांपासून उष्मात बऱयाच प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे पाराही 38 अशांवर पोहचला आहे.
तालुक्मयाच्या पश्चिम भागातील उचगाव, बसुर्ते, अतिवाड, कुदेमनी, बाची, तुरमुरी, मण्णूर, आंबेवाडी, कल्लेहोळ, यासह काकती, मुतगा, सांबरा, निलजी, कुडची, कंग्राळी खुर्द, कणबर्गी, कलखांब, धामणे, हलगा, बस्तवाड, बसरीकट्टी, sिशंदोळी आदी भागात वळीव पावसाने चांगलीच हजेरी लावली.
काही भागात वळीव पावसाने ओढ दिल्याने शेतीचे कामे रखडली होती. मात्र गुरूवारी बहुतांशी भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मशागतीच्या कामासाठी पुरक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेती कामांना जोर येणार आहे. गेल्या आठदिवसांपासून तापमानात कमालीची वाढ होऊन पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे शेती कामासाठी शिवारात गेलेल्या शेतकऱयांना घरी परतावे लागले. वाढत्या उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता.