मंत्री उमेश कत्ती यांचे वकिलांना आश्वासन
प्रतिनिधी/ बेळगाव
ग्राहक आयुक्त खंडपीठ बेळगावात स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. या न्यायालयाच्या इमारतीसाठी जागा हवी आहे, त्याची पाहणी अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक फोरम मंत्री उमेश कत्ती यांनी शनिवारी केली. वकिलांनी त्यांच्याकडे ग्राहक न्यायालयाला जागा हवी असून ती तातडीने उपलब्ध करावी, अशी मागणी केली होती. कत्ती यांनी न्यायालयाला भेट देऊन वकिलांची समस्या जाणून घेतली.
जिल्हा ग्राहक न्यायालयाच्या इमारतीला त्यांनी भेट दिली. त्यानंतर बार असोसिएशनच्या जुन्या लायब्ररीच्या हॉलमध्ये कार्यक्रम झाला. बार असोसिएशनच्यावतीने मंत्री उमेश कत्ती यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके उपस्थित होते. प्रारंभी जनरल सेपेटरी आर. सी. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून आढावा घेतला. त्यानंतर ज्ये÷ वकील डी. एम. पाटील व ऍड. एन. आर. लातूर यांनी ग्राहक न्यायालय का हवे आहे, तसेच त्यासाठी तातडीने जागा उपलब्ध करावी, अशी मागणी आपल्या भाषणामध्ये केली.
सध्या जिल्हा पंचायतच्या जुन्या इमारतीमध्ये हे खंडपीठ सुरू करावे, असे मंत्री उमेश कत्ती यांनी सांगितले. त्याचबरोबर सरकारकडे पाठपुरावा करून सध्या असलेल्या जिल्हा ग्राहक न्यायालयाच्या इमारतीवरच आणखी बांधकाम करून त्या ठिकाणी हे खंडपीठ सुरू करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. यावेळी ज्ये÷ वकील एम. बी. जिरली यांनीही आपले विचार व्यक्त केले. मंत्री उमेश कत्ती यांनी वकिलांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. येत्या अर्थसंकल्पामध्ये ग्राहक आयुक्त न्यायालयासाठी विशेष निधीची तरतूद करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
उपाध्यक्ष सी. टी. मजगी यांनी विविध समस्यांबाबतची माहिती दिली. ग्राहक न्यायालयामध्ये सध्या 4 हजार 773 खटले प्रलंबित असल्याचे यावेळी सांगण्यात आले. उपाध्यक्ष गजानन पाटील यांच्या हस्ते मंत्री उमेश कत्ती यांचा सत्कार करण्यात आला. जॉईंट सेपेटरी शिवपुत्र फटकळ यांनी आभार मानले. यावेळी ऍड. सुलतानपुरी, ऍड. मुतालिक देसाई, ऍड. पी. के. पवार यांच्यासह वकील उपस्थित होते.