विविध मागण्यांसाठी कर्मचाऱयांनी थोपटले दंड
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या अनेक वर्षांपासून ग्राम पंचायतमध्ये आम्ही कंत्राटी पद्धतीने काम करत आहोत. काही जणांना कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेतले आहे. मात्र त्यांना अद्याप नियमानुसार बढती देण्यात आली नाही. यासह इतर मागण्यांसाठी जिल्हय़ातील ग्राम पंचायत कर्मचाऱयांनी जिल्हा पंचायतसमोर ठिय्या आंदोलन केले. जिल्हा पंचायतच्या अधिकाऱयांना निवेदन सादर केले.
कायद्यानुसार बढती देणे गरजेचे आहे. याचबरोबर अजूनही काही कर्मचारी कंत्राटी पद्धतीनेच काम करत आहेत. त्यांना नोकरीत कायमस्वरुपी सामावून घेतले पाहिजे, यासह इतर मागण्या कर्मचाऱयांनी केल्या आहेत. आंदोलनामध्ये बहुसंख्य ग्राम पंचायतीच्या कर्मचाऱयांनी भाग घेतला होता. यावेळी व्ही. पी. कुलकर्णी, जे. एम. जैनेखान यांच्यासह कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.