प्रतिनिधी /बेळगाव :
अनुसुचित जमातीच्या लोकांकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. त्यांचे आरक्षण त्यांना दिले जात नाही. त्यामुळे अनुसुचित जमातींच्या विद्यार्थी, नोकरदार आणि सर्वसामान्य जनतेवर अन्याय होत आहे. तेंव्हा घटनेप्रमाणे दिलेले आरक्षण आम्हाला द्यावे, अशी मागणी हालुमत महासभेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आली आहे.
सदर मागणीचे निवेदन महसुल अधिकारी एस. एम. परगी यांना देण्यात आले. अनुसुचित जमातीला 9 टक्के आरक्षण द्यावे, याचबरोबर नोकरीमध्ये देखील वेळेत बढती द्यावी, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच त्यांना राखीवता ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शनिवारी संपूर्ण राज्यामधील हालुमत महासभेच्यावतीने प्रत्येक जिह्यामध्ये ही निवेदने देण्यात आली. आमच्या मागण्याजर मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करु, असा इशारा देखील देण्यात आला. यावेळी हालुमत महासभेचे राज्य संचालक मारुती मर्डी, जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा कुरबर, जिल्हाध्यक्ष विनायक कट्टीकर, संघटनेचे तालुका सदस्य मंजुनाथ बन्ने, मारुती सुळगेर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.