जिल्हाधिकाऱयांची सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनमुळे मजूर, कामगार व नोकरदारही अडचणीत आले आहेत. बरेच जण यामधील भाडेने घरे घेवून राहत आहेत. मात्र आता मजुरी आणि वेतन मिळत नसल्यामुळे ते अडचणीत आले आहेत. त्यामुळे त्यांना भाडय़ासाठी जबरदस्ती करु नये, अशी सक्त ताकीद जिल्हाधिकाऱयांनी केली आहे. कोणीही तगादा लावला तर कायद्यानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
लॉकडाऊनमुळे साऱयांनाच आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे कर्ज किंवा भाडे वसुलीसाठी तगादा लावणे चुकीचे आहे. कर्जवसुलीसाठी कोणीही जबरदस्ती केल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. गेले तीन महिने काम नाही त्यामुळे अनेक जण अडचणीत आले आहेत. त्याचा सर्वांनीच विचार करणे गरजेचे आहे. कोणीही जबरदस्ती करु नये, अशी सूचना त्यांनी केली आहे.