आंध्रप्रदेशात नव्या योजनेचा शुभारंभ
वृत्तसंस्था / अमरावती
आंध्रप्रदेशातील मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी सरकारने मोठी योजना सुरू केली आहे. राज्यात गुरुवारपासून घरोघरी धान्य पोहोचविले जाणार आहे. विजयवाडा येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री जगनमोहन यांनी रेशन डोअर डिलिव्हरी व्हेईकल्सना हिरवा झेंडा दाखविला आहे. लोकांना धान्यासाठी अडचणींना सामोरे जाऊ लागू नये आणि शासकीय वाहनातून धान्य त्यांच्या घरापर्यंत पोहोचावे अशी सरकारची इच्छा आहे.
राज्य सरकारने रेशनकार्डधारकांना तांदूळ आणि अन्य आवश्यक सामग्रीच्या वितरणासाठी 539 कोटी रुपयांमधून 9,260 वाहनांची खरेदी केली आहे. एका वाहनात जवळपास 5 लाख 81 हजार रुपयांच्या किमतीचे सामान असणार आहे, जे लाभार्थ्यांना टक्के अनुदानित दरावर दिले जाणार आहे. मुख्यमंत्री जगन यांनी कृष्णा, गुंटूर आणि पश्चिम गोदावरी जिल्हय़ांमध्ये सुमारे 2,500 डोअर डिलिव्हरी व्हेईकल्सचे उद्घाटन केले आहे.