महसूल मंत्री आर. अशोक यांची अधिकाऱयांना सूचना : जि. पं. मध्ये बैठक
प्रतिनिधी/ बेळगाव
नुकत्याच पडलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महसूल मंत्री आर. अशोक हे बेळगाव जिल्हय़ाच्या दौऱयावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्हा पंचायतमध्ये अधिकाऱयांची बैठक घेऊन नुकसान झालेल्या शेतकऱयांना तसेच घरे पडलेल्या कुटुंबीयांना दोन महिन्यांच्या आत नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश दिला. सरकारने प्रत्येक जिल्हय़ासाठी राखीव निधी ठेवला आहे. त्या निधीचा वापर तातडीने करून प्रत्येकाला नुकसानभरपाई मिळावी यासाठी सर्व्हे करून त्यांना नुकसानभरपाई द्यावी, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा पंचायतमध्ये झालेल्या या बैठकीला महसूल मंत्री आर. अशोक यांच्यासह पालकमंत्री रमेश जारकीहोळी, जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे, विधानसभेचे उपसभापती आनंद मामनी, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ उपस्थित होते.
पावसामुळे सुमारे 96 हजार 590 हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. तर 3 हजार 627 घरांची पडझड झाली आहे. त्या सर्व शेतीचा सर्व्हे करावा. याच बरोबर त्या शेतकऱयांना नुकसानभरपाई द्यावी, असे त्यांनी सांगितले. जिल्हय़ाकडे 88 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे सरकारकडे पैशाची कोणतीही कमतरता नाही. तातडीने संबंधितांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी अधिकाऱयांनी काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
नदीकाठावरील काही गावांतील कुटुंबांचे स्थलांतर
नदीकाठावरील काही गावांतील कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्यांच्यासाठी काळजी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्या केंद्रांमध्ये पौष्टिक आहार देण्याची सूचना करण्यात आली आहे. मी स्वतः तेथे जाऊन पाहणी केली. आहारामध्ये सुधारणा करण्याची सूचना संबंधित अधिकाऱयांना केल्याचे त्यांनी सांगितले. सकाळी नाष्टा व भाकरीचे जेवण द्यावे, असे अधिकाऱयांना सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ज्या कुटुंबांची पूर्ण घरे कोसळली आहेत त्या कुटुंबांना पाच लाख रुपये तर पडझड झालेल्या घरांच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपये दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या पाऊस कमी झाल्यामुळे पूर ओसरला आहे. तरीदेखील स्थलांतरित केलेल्या कुटुंबीयांनी माघारी फिरणे कठीण आहे. त्यामुळे जोपर्यंत पूर्ण पूर ओसरत नाही तोपर्यंत त्यांची सर्व काळजी जिल्हा प्रशासन घेईल, असे त्यांनी सांगितले.
मागील वषी घरे कोसळलेल्या कुटुंबीयांना 498 कोटी रुपये देण्यात आले आहेत. काही कारणांमुळे अनेकांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. मात्र त्यांनाही नुकसानभरपाई देण्याबाबत अधिकाऱयांना सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सरकार सर्व पद्धतीने पूरग्रस्तांना मदत करत असून प्रत्येक जिल्हय़ाला राखीव निधी दिला गेला आहे, असे त्यांनी सांगितले.
पूर आलेल्या ठिकाणचा ऊस नेण्याची सूचना
पावसामुळे ऊस पीक खराब झाले आहे. तो ऊस तातडीने साखर कारखान्यांना घेऊन जाण्यास सांगावे, अशी मागणी आमदारांनी केली. त्यावर साखर कारखाने सुरू होताच प्रथम पूर आलेल्या ठिकाणचा ऊस तसेच पडलेला ऊस तोडणी करण्याबाबत सूचना केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सोयाबिनचे खराब बियाणे शेतकऱयांना देण्यात आले आहे. त्यामुळे सोयाबिन उगवले नाही. त्या शेतकऱयांना नुकसानभरपाई अजूनही दिली नसल्याची तक्रार आमदारांनी केली. त्यावर संबंधित अधिकाऱयांना तातडीने भरपाई द्यावी, अशी सूचना आर. अशोक यांनी केली आहे.
सर्व व्यवहार लवकरच सुरळीत
कोरोनामुळे महसुलामध्ये घट झाली असली तरी आता 70 टक्क्मयांहून अधिक महसूल जमा होत आहे. त्यामुळे सर्व व्यवहार लवकरच सुरळीत होतील. कोरोनामुळे 3 हजार कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. तरीदेखील आता कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात आटोक्मयात आल्यामुळे व्यवहार सुरळीत झाले असून लवकरच महसुलामध्ये वाढ होईल, असे त्यांनी सांगितले.