सलग तिसऱया महिन्यात वाढ – सर्वसामान्यांच्या खिशावर ताण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
घाऊक बाजारातील महागाईच्या वाढत्या दराने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. मार्च महिन्यात महागाईचा दर हा 7.39 टक्के होता. आता एप्रिल महिन्यात तो 10.49 टक्क्मयांवर पोहचला आहे. महागाई दरात एकाच महिन्यात जवळपास 3.1 टक्क्मयांची वाढ झाली आहे. कच्चे तेल आणि पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती वाढल्यामुळे हा महागाई दर वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने नुकतीच घाऊक किंमतीची आकडेवारी जाहीर केली आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात महागाईने डोके वर काढल्याचे दिसून येत असल्याने सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढली आहे. महागाई दराबाबतच्या आकडेवारीनुसार, फळे, मांस, डाळी यांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. तर दुसरीकडे तांदूळ, भाज्या, कांदे-बटाटे यांच्या किंमती कमी झाल्याचे दिसून आले आहे. फेब्रुवारीत महागाई दर 4.83 टक्के इतका होता. त्यानंतर मार्च महिन्यात महागाई दर 2.56 टक्क्मयांनी वाढला आणि 7.39 टक्क्मयांवर पोहचला आहे. तर मार्च महिन्याच्या तुलनेत महागाई दर 3.1 टक्क्मयांनी वाढला असून तो आता 10.49 टक्क्मयांवर पोहोचला आहे.