स्वाभिमानी सीमाभाग विद्यार्थी पालक संघाची मागणी : परिवहनला निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर महाराष्ट्रातील काही भागात बससेवा सुरू झाली आहे. मात्र अद्याप बेळगाव तालुक्मयाला लागून असलेल्या चंदगड, आजरा आणि कोवाड भागात बससेवा सुरू झाली नाही. त्यामुळे प्रवाशांसह विद्यार्थी वर्गाचे हाल होत आहेत. यासाठी परिवहनने चंदगड, आजरा, कोवाड भागात तातडीने पूर्ववत बससेवा सुरू करावी, अशी मागणी स्वाभिमानी सीमाभाग विद्यार्थी पालक संघाने परिवहनकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शासनाने सीमाहद्दीवरील आरटीपीआरची सक्ती मागे घेतली आहे. त्यामुळे गडहिंग्लज, संकेश्वर, हलकर्णी, निपाणी, चिकोडी, अथणी, मिरज, कोल्हापूर या भागात बससेवा सुरळीत सुरू झाली आहे. मात्र चंदगड, आजरा, कोवाड भागात बससेवा सुरू करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागत आहे. विशेषतः विद्यार्थी वर्गाला पास असून देखील आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
चंदगड, आजरा आणि कोवाड भागातील सर्रास जनताही बाजार, दवाखाना आणि इतर कामांसाठी बेळगावला येत असते. मात्र मागील काही महिन्यांपासून कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा ठप्प झाली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या विविध शहरांकडे बससेवा सुरू झाली आहे. मात्र बेळगावपासून जवळ असलेल्या चंदगड, आजरा आणि कोवाड भागात बस सुरू झाली नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेषतः सीमाहद्दीवरील विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. तर विद्यार्थ्यांची देखील हेळसांड होताना दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तातडीने आजरा, चंदगड आणि कोवाड भागात बससेवा सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थी, पालक संघाने केली आहे. याबाबत संघाचे अध्यक्ष अनिल हिरेमठ यांनी परिवहनकडे निवेदन सादर केले. तसेच परिवहनच्या अधिकाऱयांशी चर्चा केली आहे. दरम्यान, अधिकाऱयांनी तातडीने बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.