अतिक्रमण विभागातर्फे सुचना करून ही परिस्थिती जौसे थे
प्रतिनिधी/ सातारा
शहरातील पार्किंगची सदस्या सध्या बिकट बनत चालली आहे. कारण यामुळे वाहतुक कोंडीचे प्रकार खुप प्रमाणात घडत आहेत. काही नागरिक तर नो-पार्किंग झोन मध्येच आपली वाहने तासंतास लावतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मंगळवार तळेरोड परिसर,
या मार्गावर तर चक्क 200 परिसरात नो-पार्किग अशा प्रकारच्या सुचनांचे फलक लावण्यात आले आहेत. पण तरी ही या भागात वडाप चालकांची वाहने व फेरीवाले तासंतास आपली वाहने थांबवितात. बहुतांश सायंकाळच्यावेळी या भागात वाहनांची गर्दी असते. त्यामुळे येथे ट्राफिक जाम होऊन वाहतुकीस ही अडथळे निर्माण होत असतात.
या भागात अतिक्रमण विभागाच्या पथकाची फेरी नियमीत असते, पण ज्यावेळी ही फेरी यामार्गावरून जाणार असल्याची कल्पना येताच येथील नो-पार्किंग झोनच्या ठिकाणी उभे असलेले फेरीवाले व वाहनचालक त्वरीत निघुन जातात. नंतर अतिक्रमण विभागाची फेरी निघुन गेल्यावर पुन्हा त्याच ठिकाणी आपले वाहन किंवा गाडा लावतात. त्यामुळे या परिसरातील पार्किंगची समस्या सध्या गंभीर बनत चालली आहे.
काही वेळा तर पोलिस विभागातील कर्मचारीच चक्क नो-पार्किंग झोनमध्ये गाडय़ा लाऊन जाता. जर अधिकारी वर्गच शासनाने घालुन दिलेल्या नियमांचे उल्लंघन करतात. तर सर्वसामान्य नागरिकांनी आता काय करावे, अशा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.