सर्वेक्षण सुरू
प्रतिनिधी / वाळपई
मंगळवारी दुपारी सत्तरी तालुक्मयाच्या वेगवेगळय़ा भागांमध्ये चक्रीवादळाचा फटका पासून जवळपास नुकसानीचा आकडा दहा लाखाच्या आसपास जाण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. यात कृषी व घराची मोठय़ा प्रमाणात नुकसान असल्याचे समोर आलेले आहे. अग्निशामक दलाच्या यंत्रणेने चांगल्या प्रकारे कार्य करून जवळपास साडे सहा लाखांची मालमत्ता वाचविण्यात महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. तरीसुद्धा कृषी बागायतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
वाळपईच्या कृषी कार्यालयातर्फे सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले असून सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतरच नुकसानीचा आकडा स्पष्ट होणार असल्याचे विभागीय कृषि अधिकारी प्रकाश राऊत यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.
याबाबतची माहिती अशी की मंगळवारी दुपारी अचानकपुणे चक्रीवादळाचा फटका सत्तरी तालुक्मयाच्या वेगवेगळय़ा भामांना बसला यात प्रामुख्याने केरी मोर्ले पर्ये त्याचप्रमाणे होंडा ग्रामपंचायत क्षेत्र वाळपईच्या नगरपालिकेतील काही भागांचा समावेश आहे.
केरी भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात कृषी बागायतीला फटका बसला. अनेकांच्या केळी नारळ व आंब्याच्या झाडांचे नुकसान झाल्याचे कृषी अधिकाऱयांचे म्हणणे आहे .चक्रीवादळाचा फटका बसल्यामुळे केळीच्या झाडांची मोठय़ा प्रमाणात हानी झाली. त्याचप्रमाणे आंब्याला झांडाना बऱयाच प्रमाणात फटका बसल्यामुळे आंबा उत्पादनाला नुकसानी सोसन करावी लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याबाबतचे सर्वेक्षण बुधवारी सकाळपासूनच सुरू करण्यात आले असून कृषी कार्यालयाचे संबंधित अधिकारी जाऊन या संदर्भात पाहणी करीत आहेत. ज्यांची नुकसानी झालेली आहे त्याकृषी उत्पादकाकडून यासंदर्भाची माहिती कार्यालयांना देण्यात येत असून त्यानुसार सर्वेक्षण हाती घेण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र अंदाजानुसार जवळपास 4 लाखापर्यंत कृषी बागायतीची नुकसान होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे . सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतरच नुकसानीचा निश्चित आकडा समोर येणार असून त्यासंदर्भात दावे खात्याच्या वरि÷ अधिकाऱयांना पाठवून त्या संदर्भाचे मदत मिळविण्याच्या दृष्टिकोनातून सहकार्य करण्यात येईल अशा प्रकारची माहिती श्री राऊत यांनी दिली.
दरम्यान केरी भागामध्ये मोठय़ा प्रमाणात नुकसानीचा फटका बसला असून अनेकांच्या घरांवर झाडे पडल्यामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसानी झाली. एकूण प्राप्त माहितीनुसार वेगवेगळय़ा ठिकाणी घरांंवर झाडे पडल्याने जवळपास तीन ते चार लाखापर्यंत नुकसान होण्याचा अंदाज आहे.वाळपईच्या मामलेदार कार्यालयातील तलाठय़ाकडून यासंदर्भात सर्वेक्षण हाती घेण्यात आले असून सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतरच यासंदर्भातील नुकसानी किती झाले हे स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.तरीसुद्धा प्राप्त माहितीनुसार मोर्ले काँलनी नारळाचे झाड पडून सच्चदानंद नाईक याच्या घराची 10 हजारांची नुकसानी,
अंजुणावडा आंबा झाड पडून उत्तम नाईक याच्या घराची 12 हजार नुकसानी घोटेली 2 याठिकाणी गणेश पर्येकर याच्या घरावर झाड पडून 15 हजार नुकसानी शिरोली येथील सागर गावस याच्या घरावर झाड पडून 10 हजारांची नुकसानी, होंडा येथील शैलैजा पोकळे याच्या नेनो कारवर झाड पडून 2 हजारांची नुकसानी, केरी आजोबा नगर याठिकाणी प्राजकी पांडुरंग नाईक याच्या घरावर फणसाचे झाड पडून 50 हजारांची नुकसानी, तेमवाडा केरी येथील गोपाळ केरकर याच्या घराची नुकसानी 10 हजार वाळपई सय्यद नगर येथील सैफुल्ला हुसारी याच्या दुचाकीवर झाड पडून जवळपास दोन हजारांचे नुकसान झाले, याचठिकाणी सईद सर्तेज यांच्या घरावर झाड पडून पाच हजाराची नुकसानी झाली. वाळपई अग्निशामक दलाच्या यंत्रणेने केलेल्या भगीरथ कामगिरीमुळे जवळपास साडेसहा लाखांची मालमत्ता वाचविण्यात यश आले. वेगवेगळय़ा घटनेत झालेली ही नुकसानी व त्यानंतर त्यांनी केलेली कामगिरी यामुळे मोठय़ा प्रमाणात मालमत्ता वाचविली असल्याची माहिती उपलब्ध झाली यासाठी अधिकारी श्रीपाद गावस सहाय्यक अधिकारी प्रशांत धारगळकर,चंद्रकांत माणगावकर,अशोक नाईक, तुळशिदास झर्मेकर,सुनील गावस,सतिश डेगवेकर,गोकुळदास डेगवेकर,आनंद शेटकर,अविनाश नार्वेकर, रामा नाईक यांनी महत्त्वाचे योगदान दिले.