वाळपई / प्रतिनिधी
शुक्रवारी सायंकाळी सत्तरी तालुक्मयात झालेल्या चक्रीवादळामुळे सुमारे 25 लाखांचे नुकसान झाले आहे. होंडा पंचायत क्षेत्रातील वीजपुरवठा शनिवार पर्यंत खंडित होता. इतर ठिकाणी वीज वाहिन्यांची दुरुस्ती पूर्ण झालेली होती. या वादळात वीज खात्याला दहा लाखांचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कृषी बागायतींची ही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार आठ घरांवर झाडे पडून त्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. यातील अनेक घरांवर पडलेली झाडे हटवण्याचे काम अद्याप सुरू होते.
वेगवेगळय़ा भागांमध्ये चक्रीवादळाचा फटका पासून सुमारे आठ घरांचे नुकसान झालेली आहे. त्याचप्रमाणे एकूण अग्निशामक दलाच्या कार्यालयात एकूण 26 कॉल्स आले असून आतापर्यंत 12 ठिकाणी दलाच्या जवानांनी धाव घेऊन रस्त्यावर पडलेली झाडे वर घरावर पडलेली झाडे दूर करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. उर्वरित पंधरा ठिकाणी रस्त्यावरील व घरावर पडलेली झाडे दूर करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे योगदान देत असल्याचे अधिकारीवर्गाने स्पष्ट केलेले आहे. आतापर्यंत या यंत्रणेकडून पाडेली, येथील लवु गावकर शिवराम गावकर नाणूस बेतकेकर वाडा ,मलपण ,वाळपई आदी ठिकाणी घरावर झाडे हटविण्यात आलेली आहे . त्याचप्रमाणे रस्त्यावर अनेक ठिकाणी पडलेली झाडे दूर करण्याच्या कामात योगदान देत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
वीज खात्याचे सुमारे दहा लांखाचे नुकसान
या चक्रीवादळात वीज खात्याला जबरदस्त फटका बसला आहे. या खात्याचे अधिकारी वर्गाकडून मिळालेल्या माहितीनुसार एकूण 27 खांबांची मोडतोड झाली असून असुन वीज वाहिन्या मोठय़ा प्रमाणात अस्ताव्यस्त पडलेले आहेत. यामुळे वीज खात्याला जवळपास दहा लाखांचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. महत्त्वाची बाब अशी की शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सदर प्रकार घडल्यानंतर वीज खात्याचे यंत्रणेने युद्धपातळीवर काम करून वेगवेगळय़ा ठिकाणी वीज वाहीन्याची दुरुस्ती आज पूर्ण केली. सध्या भिरोंडा पंचायत क्षेत्रातील काही गाव वगळता इतर सर्व ठिकाणी वीजपुरवठा पूर्वपदावर आल्याचे अधिकारी वर्गाने स्पष्ट केलेले आहेत. पंचायत क्षेत्रातील ज्या ठिकाणी वीज वाहिन्यांची दुरुस्ती झालेली आहे त्यांची दुरुस्ती आज उशिरापर्यंत पूर्ण होण्याची आशा अधिकारी वर्गाने स्पष्ट केलेली आहे .आतापर्यंत एकूण 27 खांबांची मोडतोड झाली असून वीज खांबाची मोठय़ा प्रमाणात मोडतोड झाल्यामुळे नुकसानीचा आकडा जवळपास सात लाखांच्या आसपास जाण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नसल्याचे अधिकारी वर्गाने स्वस्त केले.
कृषी खात्याची यंत्रणा मात्र गाफील
दरम्यान यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सत्तरी तालुक्मयात जवळपास 50 टक्के गावाला या चक्रीवादळाचा फटका बसल्यामुळे कृषी बागायतीचे प्रचंड प्रमाणात नुकसानी झालेली आहे. खासकरून कृषी बागायतीच्या नुकसानीचा अंदाज घेता हा आकडा वीस लाखांपेक्षा जास्त होण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. केळी बागायची मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे चक्रीवादळाच्या धक्क्यामुळे नारळ आंबे काजू यांची मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याचे एकूण मिळालेल्या माहितीनुसार समजते. नानोडा गावांमध्ये त्याचा जबरदस्त फटका बसल्याचे चित्र समोर आलेले आहे. त्याचप्रमाणे अडवय येथील कृषी बागायतीला ही बऱयाच प्रमाणात फटका बसला आहे. एरवी कृषी खात्यातर्फे यासंदर्भात गांभीर्याने लक्ष देऊन सर्वेक्षण हाती घेणे गरजेचे होते मात्र अजून पर्यंत ही यंत्रणा पूर्णपणे गाफील असल्याचे समोर आले आहे. फेब्रुवारी महिन्यात अशाच प्रकारे मोठय़ा प्रमाणात सत्तरी तालुक्मयाला चक्रीवादळाचा फटका बसल्यामुळे व प्रचंड प्रमाणात पावसाच्या झपाटय़ाने 90 लाखांच्या आसपास शेतकरी बांधवांना नुकसानीला सामोरे जावे लागले होते. मात्र अजून पर्यंत कृषी खात्याकडून शेतकऱयांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे समोर आलेले आहे. यामुळे सर्वेक्षण हाती घेऊनही त्याचा कोणताच फायदा होत नसल्याचे शेतकरी बांधवांचे म्हणणे आहे.