नवी दिल्ली /प्रतिनिधी
दक्षिण अरबी समुद्रात १५ मेच्या आसपास चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ उत्तर पश्चिम सरकण्याची शक्यता आहे. १४ मे रात्रीपासुन केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र-गोवा किनार पट्टीच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, चक्रीवादळाच्या पूर्वी एनडीआरएफने आपली पथके तैनात केली आहेत.
दरम्यान हवामान विभागाने रविवारी हे चक्रीवादळ किनारपट्टीभगवर धडकणार असल्याचे म्हंटले आहे. या वादळामुळे गुजरात, केरळ, कर्नाटकसह देशाच्या बर्याच भागात विनाश होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. याबाबत हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हे लक्षात घेता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने या पथकांमध्ये आपले पथक तैनात केले आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे डीजी एस. एन. प्रधान यांनी सांगितले की चक्रीवादळाच्या धोक्यामुळे केरळ, कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्रात यापूर्वी २४ पथके तैनात करण्यात आली आहेत आणि २९ पथके तयार आहेत.
हवामान विभागाने असे म्हटले आहे की चक्रीवादळाच्या वादळामुळे १७ ते १८ मे दरम्यान गुजरातमध्ये विनाश होऊ शकेल. पश्चिम किनारपट्टीवरून येण्याची शक्यता आहे. विभागाने सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा दिला असून मच्छिमारांना समुद्राजवळ न राहण्यास सांगितले आहे.