वार्ताहार / बांबवडे
चरण तालुका( शाहूवाडी) येथील जवान अमित भगवान साळुंखे वय (30) यांचे मध्य प्रदेश मधील बालाघाट येथे गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास ड्यूटीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते123 बटालियन केंद्रीय राखीव पोलीस( C R.P F) मध्ये कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. निधनाची बातमी रात्री साडेनऊ वाजता त्यांचे वडी लांना दूरध्वनीवरून ओफीस कळविले .
साळुंखे २०१० साली केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये पुण्यातून भरती झाले होते. त्यांचे वडील इचलकरंजी येथे डेक्कन मिलला नोकरीस असल्याने प्राथमिक शिक्षण इचलकरंजीतच तर माद्यमिक शिक्षण सरुड येथे झाले. त्याला हॉलीबॉल या खेळाची आवड होती. तो त्याची पत्नी आणि तीन वर्षाची लहान मुलगी सोबतच बालाघाट येथे वास्तव्यास होती .त्यांच्या निधनाची बातमी त्यांचे घरी व गावात समजताच या परिसरात शोककळा पसरली. त्यांचे पार्थिव शनिवारी सकाळी १० पर्यंत त्याच्या मूळ चरण गावी येणार आहे.
अमित गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये गावी आला होता .सद्या तो बालाघाट मध्य प्रदेश येथे मुख्य अधिकारी त्यांच्या सोबत ड्यूटीवर होता त्याला यापूर्वी कोणताही त्रास नव्हता जानेवारी पासून तो बदली झाल्याने जम्मू काश्मीर येथे रूजू होणार होता. आपली बहीण आश्विनी हिला बुधवारी शेवटचा खुुशालीचा फोन आला होता आणि आईला संध्याकाळी करतो असे सांगून फोन बंद केला परंतू साहेबांच्या बरोबर ड्यूटीवर असल्याने फोन करु शकला नाही . त्यानंतर फोन आला तो त्याच्या वडीलांना ऑफीसरचा निधन वार्ताचा.
त्याची बहीण अश्विनी म्हणाली अमित असे म्हणायचा कि मरण प्रत्येकाला येते पण मला मरण येणार ते देशसेवा करूनच माझे पार्थिव हे तिरंग्यात लपेटूनच येणार इतकी देशसेवेची आवड त्याला होती.
चरण गावचे व मार्केट कमिटीचे माजी सभापती बाबा लाड म्हणाले . चरण गाव हे आर्थिक दृष्टया सधन गाव असताना देखील केवळ देशसेवा करण्याचा उदात्त हेतू डोळ्यासमोर असल्याने त्यांना भरती होण्याचा निर्णय घेतला तो आमचा गावाच्या वतीने आभिमानाचा आहे . त्याची ही तळमळ बघून तरुणांनी देखील आदर्श घेऊन पुढे जावे आणि आपल्या देशाबरोबर गावाचे नाव लौकिक करावे. त्यांचे पश्चात आई वडील, पत्नी, ३ वर्षाची मुलगी, बहीण ,चार चुलते असा मोठा परिवार आहे.