पिकलेल्या फणसाचा आस्वाद घेण्यासाठी लोकवस्तीच्या जवळ
उदय सावंत / वाळपई
समृद्ध व संवर्धीत जंगलाची परंपरा सांगणाऱया सत्तरी तालुक्मयातील ग्रामीण भागात रानटी जनावरांचा वावर आता नवीन राहिलेला नाही .आतापर्यंत गवे रेडे रानडुक्कर बिबटय़ा अशा अनेक जनावरांनी सत्तरी तालुक्मयातील नागरिकांना अक्षरशा नामोहरण करून सोडले आहे .यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांना सत्तरीवासियांना तोंड द्यावे लागत आहे . असे असतानाच आता नवीन स्वरुपाची समस्या सत्तरीवासियांना भासू लागली आहे. घनदाट जंगल व लोकवस्तीपासून लांब अंतरावर वास्तव्य करणाऱया अस्वलानी आता सत्तरी तालुक्मयातील काही गावाच्या लोकवस्ती नजीक घेण्यास प्रारंभ केला असून सध्या फणसाचा मौसम असल्यामुळे सत्तरी तालुक्मयातील हिवरे चरावणे गोळवली आदी भागात अस्वलांचा वावर वाढत असल्याची माहिती हाती आली आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनखाते व म्हादई अभयारण्याच्या अधिकाऱयांनी केले असून कोणत्याही प्रकारचा आततायीपणा करू नये अशा प्रकारची विनंती करण्यात आलेली आहे.
त्यासंदर्भाची माहिती अशी की गेल्या जवळपास एक महिन्यापासून वरील गावाच्या लोकवस्तीपासून योग्य अंतरावर अस्वलांचा वावर समोर आलेला आहे. यामुळे काही नागरिकांना यासंदर्भाची माहिती मिळाल्यानंतर गावात भितीचे वातावरण पसरले असून अजून पर्यंत कोणत्याही प्रकारची दहशत अस्वलाने माजविले नाही. यामुळे कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याचे कारण नसले तरीसुद्धा संध्याकाळी 6 वाजण्याच्या नंतर नागरिकांनी जंगलाचा प्रवास करू नये अशा प्रकारचे आवाहन वन खात्याच्या सूत्रांकडून करण्यात येत असल्याचे समजते.
फणस पिकल्याने अस्वलांचा वावर.
दरम्यान यासंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार सध्या फणस पिकण्याचा मौसम आहे .यामुळे पिकलेले फणस हे अस्वलांचे अत्यंत आवडते खाद्य असल्यामुळे अस्वलानी आता हळूहळू लोकवस्तीच्या नजीक येण्यास प्रारंभ केलेला आहे .सतरी तालुक्मयात लोकवस्तीनजीक त्याचप्रमाणे काजू बागायतीला मोठय़ा प्रमाणात फणसाची झाडे आहेत. सध्या फणस पिकण्यास प्रारंभ झालेला आहे. यामुळे या पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी ही अस्वले आता गावानजीक घेण्यास सुरुवात झाल्याचे समजते. फणसाच्या झाडावर चढून अस्वले फणस खात असतात. यामुळे त्यांच्या चढण्याचे पुरावे वेगवेगळय़ा ठिकाणी पहावयास मिळत असून यामुळे अस्वलांचा वावर लोकवस्ती नजीक वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
अस्वल हा रानटी प्राणी असला तरीसुद्धा तो सहजासहजी मानवावर आक्रमण करत नाही .मानवाने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास तो प्रतिहल्ला म्हणून माणसावर हल्ला करू शकतो. यामुळे सध्यातरी कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याचे कारण नसून आतापर्यंत सत्तरी किंवा गोव्याच्या अन्य भागात अस्वलाने कोणावर हल्ला केल्याचे उदाहरण नसल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे.
याबाबत गोळावली हिवरे चरवणे डोंगुर्ली आदी भागातील नागरिकांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार यासर्व गावातील फणसाच्या झाडावर अस्वल चढण्याचे पुरावे सापडलेले आहेत. सध्या फणस पिकत असल्यामुळे ते खाण्यासाठी अस्वले फणसाच्या झाडावर अत्यंत टोकापर्यंत चढू शकतात. अस्वल जनावर हे प्रामुख्याने रात्रीच्यावेळी फणसाचा आस्वाद घेण्यासाठी लोकवस्तीनजीक येत असतात. दिवसाच्या प्रकाशात मात्र त्यांचा कोणत्याही प्रकारचा प्रादुर्भाव नसतो. त्यामुळे आतापर्यंत सदर भागातील कोणीही नागरिकाने अस्वल लोकवस्ती नजीक पाहिलेले नाही. यामुळे कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याचे कारण नाही तरीसुद्धा संध्याकाळच्या नागरिकांनी कोणत्याही कारणाखाली जंगलामध्ये जाऊ नये अशा प्रकारचे आवाहन वनखात्याच्या सूत्राकडून करण्यात आलेले आहे.
तसे पहावयास गेलो तर गेल्या अनेक वर्षापासून सत्तरी तालुक्मयातील घाट माथ्यावर असलेल्या सर्ला गावात लोकवस्ती नजीक येऊन अस्वले फणस खात असल्याचे अनेक उदाहरणे आहेत. मात्र घाटमाथ्याच्या खालच्या बाजूला म्हणजे वरील गावांमध्ये अजूनही लोकवस्ती नजीक येऊन फणस खाण्याचा प्रकार अस्वलाने केलेला नव्हता. यंदा मात्र हा प्रकार पहावयास मिळत असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केलेले आहे.
अभयारण्याच्या कँमेरात अस्वलांचे फोटो बंदिस्त.
दरम्यान या संदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार म्हादई अभयारण्याच्या व्यवस्थापनाने वेगवेगळय़ा ठिकाणी रानटी जनावराची हालचाल अधोरेखित करण्यासाठी लावलेल्या कॅमेरामध्ये अस्वलांचे फोटो बंदिस्त झाल्याचे माहिती हाती आली आहे. या फोटोमध्ये अनेक फणसावर अस्वले चढून फणस खाताना त्यांची दृश्य याकॅमेरामध्ये टिपण्यात आलेली आहेत. यामुळे घनदाट जंगले सोडून ही अस्वले आता लोकवस्तीचे येत असल्याचे पुरावे या कॅमेऱयाच्या माध्यमातून स्पष्ट झालेले आहे.
आताच अस्वले लोकवस्ती नजीक का?
दरम्यान फणस हा अस्वलांचा आवडता खाद्य असलेतरी यापूर्वी ही अस्वले लोकवस्ती नजीक येत नसल्याची उदाहरणे अभावानेच आढळतात.
यंदा मात्र अशा मोठय़ा प्रमाणात असलेले लोकवस्ती नजीक येऊन फणस खात असल्याची उदाहरणे सर्रासपणे कानावर येत आहेत. यामुळे यंदा ही अस्वले लोकवस्तीनजीक येण्याची कारणे काय अशा प्रकारचा सवाल सध्यातरी नागरिक उपस्थित करताना आढळतात. या संदर्भात मिळालेल्या सविस्तर माहिती गेल्या अनेक वर्षापासून वनखात्याने जंगलामधील रानव्यवस्थापन केलेले नाही. यामुळे रानटी जनावराने नैसर्गिक स्तरावर उपलब्ध होणारा चारा सध्या उपलब्ध होत नसल्यामुळे रानटी जनावरे आपल्या खाद्याच्या शोधात लोकवस्ती नजीक येत असल्याचे स्पष्ट झालेले आहे .यापूर्वी वनखात्याच्या माध्यमातून डोंगराळ भागांमध्ये रान व्यवस्थापन यंत्रणा राबविण्यात येत होती. या व्यवस्थापनांतर्गत जंगलामधील उघडय़ा पठारावर चारा निर्माण होण्यासाठी पोषक स्वरूपाची यंत्रणा उभी करण्याची प्रक्रिया होत होती. गेल्या दहा वर्षापासून ही प्रक्रिया पूर्णपणे बंद झाल्यामुळे रानटी जनावरांचा चारा उपलब्ध होण्यास कठीण बनत असल्यामुळे ही रानटी जनावरं लोकवस्तीनजीक येत असल्याचे मिळालेल्या माहितीनुसार समजते.