लॉकडाऊनचा प्रभाव : एप्रिलमधील आकडेवारी सादर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोविड 19 च्या वाढत्या महामारीमुळे जगासोबत देशातील व्यापार उद्योग प्रभावीत झाले असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये देशव्यापी लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्यात भारताचे चहाचे उत्पादन 54 टक्क्मयांनी घटून 3 कोटी 90.2 लाख किलोग्रॅमवर राहिले आहे. मागच्या वर्षात समान महिन्यात उत्पादन 8 कोटी 44.9 लाख किलोग्रॅमवर राहिले होते.
एप्रिलमध्ये 3 कोटी 90.2 लाख किलोग्रॅमच्या एकूण चहा उत्पादनामध्ये जवळपास तीन कोटी 37.9 लाख किलोग्रॅम इतका वाटा सीटीसी चहाचा आहे तर 47.4 लाख किलोग्रॅम पारंपारिक चहा आणि 4.9 लाख किलोग्रॅम ग्रीनटीचा यात वाटा आहे. अस्थिर आकडय़ानुसार आसाममध्ये चहा उत्पादन एप्रिलमध्ये घटून 1 कोटी 32.1 लाख किलोग्रॅमवर राहिले आहे. एक वर्षापूर्वी ते 4 कोटी 49.8 लाख किलोग्रॅम होते.
पश्चिम बंगालमध्ये चहाचे उत्पादन एप्रिलमध्ये 96.4 लाख किलोग्रॅम झाले होते. जे एप्रिल 2019 रोजी दोन कोटी 33.4 लाख किलोग्रॅमच्या घरात राहिले होते. यासोबतच उत्तर भारतामधील चहाचे उत्पादन एक वर्षाअगोदर याच महिन्यात सात कोटी 4.7 लाख किलोग्रॅमने घटले.