पुणे / प्रतिनिधी :
राजकारणात येणे हे काम कठीण असले, तरी चांगला राजकारणी म्हणून लोकांची वाहवा मिळविणे, हे त्याहून अधिक कठीण आहे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथे व्यक्त केले.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूटच्या डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे पुण्यात पाचव्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले होते. एमएनजीएलचे संचालक राजेश पांडे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, संस्थेचे उपाध्यक्ष व संसदेचे संस्थापक अध्यक्ष अŸड. शार्दुल जाधवर, सुरेखा जाधवर आदी उपस्थित होते. या वेळी खासदार धैर्यशील माने, आमदार सिद्धार्थ शिरोळे, राम सातपुते, जिल्हा परिषद सदस्य पुरस्कार रवी पाटील तमनगौंडा, सरपंच पुरस्कार कविता घोडके पाटील यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
पाटील म्हणाले, सामान्य नागरिक आपले एक मत देऊन प्रतिनिधी म्हणून गाव, राज्य व देश चालविण्याचे काम राज्यकर्त्यांना सोपवितात. मात्र, अनेक राज्यकर्ते ते काम नीट करीत नाहीत. निवडणूका, सत्ता, विकास हा विषय बाजूला ठेवून व्यवसाय तयार होतो. राज्यकर्ता हा खऱया अर्थाने जनतेचा प्रतिनिधी होईल, असा प्रयत्न प्रत्येकाकडून हवा.